AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : शिंदे सरकारला मनोज जरांगे पाटील यांना संपवायचंय; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Shivsena Thackeray Group MP Sanjay Raut on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि शिंदे सरकारची भूमिका; संजय राऊतांचा घणाघात. काय म्हणाले संजय राऊत? वाचा सविस्तर बातमी...

Manoj Jarange Patil : शिंदे सरकारला मनोज जरांगे पाटील यांना संपवायचंय; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Sep 13, 2023 | 11:12 AM
Share

मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी आग्रही असणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सोळावा दिवस आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केलेत. राज्यातील शिंदे-फडवणवीस-पवार सरकारला मनोज जरांगे पाटील यांना संपवायचंय आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीवरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केलेत. मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकार काही करू इच्छित नाही. सरकार केवळ आश्वासन देतं. हे सरकार मनोज जरांगे पाटील यांना मारू इच्छितं. त्यांना हे सरकार संपवू पाहातंय, असं संजय राऊत म्हणालेत.

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची आज पहिली बैठक आहे. यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. मुंबईत इंडिया आघाडी बैठकीत त्या संदर्भात निर्णय झाला. इंडिया आघाडीच्या कोऑर्डिनेशन कमिटीची पहिली बैठक आज दिल्लीत शरद पवारांचे निवासस्थानी होणार आहे. 14 सदस्य या बैठकीला उपस्थित राहतील. समितीमध्ये 14 मेंबर उपस्थित राहतील. तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी उपस्थित राहणार नाही .आत्ताच माझ त्यांच्या नेत्यांशी बोलणं झालं. आजच बैठक आहे आणि आजच अभिषेक बॅनर्जी यांना ईडीची नोटीस देऊन समन्स दिला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

अभिषेक बॅनर्जी यांना ईडीने नोटीस पाठवणं हा रडीचा डाव आहे. ही बदल्याची कारवाई आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती गेल्या सातत्याने दबाव सूड बुद्धीचे राजकारण सुरू आहे. काही नेत्यांवरती दबाव आहे. माझ्यावरती देखील दबाव आहेत. आम्ही यातून एक मार्ग असा काढलेला आहे. काही झालं तरी या दबावामुळे झुकायचं नाही हेच आमचं प्रत्युत्तर आहे. अभिषेक बॅनर्जी यांना आजच्या बैठकीत उपस्थित राहू नये, म्हणून त्यांना समज पाठवण्यात आले आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर घणाघात केलाय.

Follow Us
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?