AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांचा मोठा निर्णय, पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आता पोलीस ठाण्यात यायची गरज नाही, मुंबई पोलीस आयुक्त म्हणतात रिपोर्ट करा

मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाचे आयुक्त पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी मुंबईकरांना दिलासा देणारे निर्णय सुरु केले आहेत.

पोलिसांचा मोठा निर्णय, पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आता पोलीस ठाण्यात यायची गरज नाही, मुंबई पोलीस आयुक्त म्हणतात रिपोर्ट करा
संजय पांडे यांचा मुंबईकरांसाठी मोठा निर्णयImage Credit source: Twitter
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 12, 2022 | 2:58 PM
Share

मुंबई : मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाचे आयुक्त पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी मुंबईकरांना दिलासा देणारे निर्णय सुरु केले आहेत. संजय पांडे यांनी मुंबई पोलिसांचा कारभार जनताभिमुख करण्याचा प्रयत्न केलाय. मुंबई पोलिसांकडून नो पार्किंगमध्ये लावली जाणारी वाहनं क्रेनद्वारे न उचलण्याचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आला होता. यानंतर आणखी एक महत्त्वाचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. ज्या मुंबईकर नागरिकांना पासपोर्ट पडताळणीसाठी (Passport Verification) मुंबई पोलिसांच्या कार्यालायत जावं लागायचं ते आता पांडे यांच्या निर्णयानं बंद होणार आहे. संजय पांडे यांनी मुंबईकरांना ही चांगली बातमी ट्विट द्वारे दिली आहे. मुंबईकरांनी देखील या निर्णयाचं स्वागत केल्याचं दिसून येत आहे.

संजय पांडे यांचा नेमका निर्णय काय?

भारतीय नागरिकाला कोणत्याही कारणासाठी देशाबाहेर जायचं असल्यास त्याकडे पासपोर्ट असणं आवश्यक असतं. पासपोर्ट काढण्यासाठी पोलिसांकडून संबंधित व्यक्तीबद्दल पडताळणी केली जाते. यामध्ये पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस स्टेशनला जावं लागतं. या प्रक्रियेत अनेकदा वेळ लागतो. नागरिकांना देखील अनेकदा पोलीस स्टेशनला जावं लागतं. मात्र, आता संजय पांडे यांनी पासपोर्ट पडताळणीसंदर्भात घेतलेला निर्णय दिलासादायक ठरणार आहे. संजय पांडे यांनी हा निर्णय जाहीर करताना पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलीस स्टेशनला बोलावणार नसल्याचं म्हटलं आहे. अपवादात्मक स्थितीत नागरिकांना पोलीस स्टेशनला यावं लागेल, असं ते म्हणाले आहेत.

तक्रार करण्याचं आवाहन

संजय पांडे यांनी पासपोर्ट पडताळणी संदर्भातील निर्णय जाहीर करताना मुंबईकरांना एक आवाहन देखील केलं आहे. पासपोर्टसाठी मुंबईकरांना आता पोलीस स्टेशनला यावं लागणार नाही. अपवादात्मक स्थिती पोलीस स्टेशनला यावं लागेल, असं ते म्हणाले आहेत. मात्र, एखाद्या ठिकाणी या निर्णयाचं पालन होत नसल्यास थेट तक्रार दाखल करा, असं संजय पांडे म्हणाले आहेत.

मुंबईकरांकडून निर्णयाचं स्वागत

संजय पांडे यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबईकरांनी सोशल मीडियावरुन या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मुंबई करांनी संजय पांडे यांच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. संजय पांडे आगामी काळात मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कोण कोणते निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे. संजय पांडे यांनी यापूर्वी महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 8 तासांची ड्युटी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचं देखील स्वागत करण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

मोठी बातमी : वकिलानं अंगावर पेट्रोल ओतलं, नांदेड कोर्टाच्या आवारात अनर्थ टळला, काय घडला प्रकार?

कोण आहे तेजस मोरे, ज्याच्यावरय प्रवीण चव्हाणांचं स्टिंग करून फडणवीसांना दारुगोळा पुरवल्याचा आरोप!

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?