AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai pollution: मुंबईची हवा दिल्लीपेक्षा जास्त धोकादायक, कोण कालवतंय मुंबईच्या हवेत विष?

प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले आहे. मुंबईच्या प्रदूषणाला नेमके कोण जबादार आहे?

Mumbai pollution: मुंबईची हवा दिल्लीपेक्षा जास्त धोकादायक, कोण कालवतंय मुंबईच्या हवेत विष?
मुंबईचे प्रदूषण Image Credit source: TV9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 13, 2022 | 3:15 PM
Share

मुंबई,  देशाची राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाची (Delhi Pollution) जगभरात चर्चा होत आहे, मात्र नुकतीच समोर आलेली माहिती जास्त धक्कादायक आहे. आर्थिक राजधानी मुंबईने प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीला मागे टाकले आहे. अहवालानुसार मुंबईतील हवेची गुणवत्ता (Mumbai air Quality) अत्यंत खालावलेली आहे. मुंबईत काही ठिकाणी हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकाने 300 चा टप्पा ओलांडला तर काही ठिकाणी 345 पर्यंत पोहोचलेला आहे, ही पातळी अत्यंत खराब मानली जाते. सोमवारी मुंबईची एकूण AQI पातळी 225 नोंदवण्यात आली. तर दिल्लीची एकूण AQI पातळी 152 होती. ही आकडेवारी SAFAR (सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) ची आहे ज्याने मुंबईची AQI पातळी खराब असल्याचे नोंदवले आहे.

मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या AQI पातळीची नोंद झाली. मालाडमधील हवेची गुणवत्ता 311 होती जी अत्यंत खराब आहे. त्यापाठोपाठ मांढगाव आणि चेंबूरमध्ये 303 होते. वांद्रे-कुर्ला येथे AQI पातळी 269 नोंदवण्यात आली.

काय असतो AQI?

AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नुसार, मुंबईतील हवेची गुणवत्ता 168 (मध्यम) आणि दिल्लीतील 218 (खराब) आहे. आता CPCB आणि SAFAR च्या आकडेवारीत फरक का आहे याबद्दल जाणून घेऊया. खरं तर, SAFAR ची शहरातील नऊ ठिकाणी निरीक्षण केंद्रे आहेत तर CPCB 18 स्थानांवर आधारित एकूण AQI मोजते. दुसरीकडे, सीपीसीबीची दिल्लीत 36 वायु गुणवत्ता निरीक्षण केंद्रे आहेत.

मुंबईतील प्रदूषणासाठी कोण जबाबदार?

काही दिवसांपूर्वी, G20 शेर्पा अमिताभ कांत आणि महापालिका आयुक्त IS चहल यांच्यात झालेल्या संभाषणात मुंबईतील खराब AQI चा मुद्दा पुढे आला होता. चहल यांनी मोठ्या प्रदूषणासाठी रिफायनरीज आणि टाटा पॉवर प्लांटला जबाबदार धरले, तर कांत यांनी सोमवारी सांगितले की, रिफायनरीजमधून सल्फर-डायऑक्साइड उत्सर्जन निर्धारित नियमांमध्ये होत आहे. कांत केंद्रीय पेट्रोलियम सचिव एम एम कुट्टी यांच्याशी देखील बोलले, म्हणाले की माहुल प्रदेशातील दोन रिफायनरींनी सल्फर उत्सर्जन कमी करणे अपेक्षित आहे.

दुसरीकडे यासाठी हवेतील आद्रता,  ढगाळ वातावरण आणि वाहनांच्या अतिवापरामुळे प्रदूषणात वाढ झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल