AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुंबईतील चेंबुर आणि विक्रोळी या भागात पावसामुळे शनिवारी रात्री दोन मोठ्या दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळालं. चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याने 14 जणांना प्राण गमवावे लागले, तर विक्रोळीत घरांवर दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला.

मुंबईतील विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
विक्रोळीत दरड कोसळून दुर्घटना
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 9:22 AM
Share

मुंबई : मुंबई शहर-उपनगरात मध्यरात्री पावसाचा कहर पाहायला मिळाला. विक्रोळीतील पंचशील नगर भागात पावसामुळे पाच-सहा घरांवर दरड कोसळली. यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले आहेत. आणखी सात ते आठ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिका आणि NDRF कडून बचावकार्य सुरु आहे.

मुंबईतील चेंबुर आणि विक्रोळी या भागात पावसामुळे शनिवारी रात्री दोन मोठ्या दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळालं. चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याने 14 जणांना प्राण गमवावे लागले, तर विक्रोळीत घरांवर दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला. दोन्ही ठिकाणी बचावकार्य सुरु असून ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती आहे. त्यामुळे दोन्ही घटनांमधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

विक्रोळी पश्चिम भागातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील पंचशील चाळीतील सूर्या नगर परिसरात ही घटना घडली. शनिवारी मध्यरात्री दोन वाजून 40 मिनिटांच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली. दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना राजावाडी रुग्णालयात नेले असता, तिघा जणांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. तर दोन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ :

मुंबईत पावसाचा जोर

मुंबईतील विविध भागात शनिवारी रात्रीपासून जोरदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं. बहुतांश सखल भागात पाणी साचलं होतं. पहाटेच्या सुमारास पावसाने उसंत घेतली असली तर रस्ते जलमय झाले होते.

चेंबुरमध्ये भिंत कोसळून हाहाःकार

दुसरीकडे, मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत पावसाचा हाहाकार, चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 11 जणांचा मृत्यू

Mumbai Rain Live : वाशीनाका-चेंबूरमध्ये पावसाचं रौद्ररुप

(Mumbai Rains caused building collapsed in Vikhroli area due to landslide)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.