वंचित मविआत येणार की नाही?; संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे…

Sanjay Raut on Prakash Ambedkar Vanchit Mahavikas Aghadi : प्रकाश आंबेडकर यांची भूमिका काय?; इंडिया आघाडीत येणार की नाही?, संजय राऊतांचं स्पष्ट भाष्य... संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

वंचित मविआत येणार की नाही?; संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे...
Follow us
| Updated on: Mar 04, 2024 | 11:08 AM

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 04 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसात जाहीर होईल. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होऊ शकते. तशी चर्चा सुरु आहे. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भाष्य केलंय. प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय नेते आहेत. आमचा आणि त्यांचा उत्तम संवाद सुरू आहे. प्रत्येकाला त्यांचा पक्ष वाढावा. त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. आम्हीही करतो तेही करतात… आमच्यामध्ये हुकूमशाही विरोधात लढण्यात कोणताही मतभेद नाही, असं संजय राऊत म्हणाले.

आंबेडकर आमच्यासोबत येतील- राऊत

भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा त्यांनी निर्माण केलेलं संविधान हे पायदळी तुडवण्याचं काम सुरु केलं आहे. संविधान तुडवणाऱ्याचे पाय खेचून त्यांना खाली पाडण्याची आंबेडकरांची भूमिका आहे. त्यासाठी एकीच्या वज्रमुठी ची आवश्यकता आहे. त्यासाठी उद्या आम्ही एकत्र बसत आहोत. मला खात्री आहे. प्रकाशजी हे राष्ट्रीय प्रवाहात असल्यामुळे ते पूर्णपणे देशाच्या जन माणसाचा अंदाज घेऊन इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यासोबत राहतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.

हा तर गडकरींचा अपमान- राऊत

भाजपकडून 195 उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नाही. यावर राऊतांनी टीका केलीय. भाजपच्या पहिल्या यादीत कृपाशंकर सिंग यांचं नाव येऊ शकतं. पवन सिंग यांचं नाव येऊ शकतो मात्र महाराष्ट्रातून नितीन गडकरी यांचा नाव पहिल्या यादीत न येणं हा त्यांचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे. ते खूपच स्पष्ट वक्ता आहेत. खूपच प्रामाणिक नेते आहेत. आम्हा सर्वांना वाईट वाटलं की त्यांचं नाव नाही, असं राऊत म्हणाले.

मोदींवर निशाणा

मोदींनी असे पाच प्रकल्प दाखवले पाहिजे जे मोदींनी केले आहेत. मोदींनी दहा वर्षाचे जी उद्घाटन केली आहेत. ते प्रकल्प 2014 च्या आधीचे आहेत. मोदी आणि त्यांचे सरकार नेहमीच खोटं बोलत आलं आहे. आता दोन-तीन महिने राहिले आहेत. खोटे बोलण्याची जी नशा आहे… ती करून घ्या, असं टीकास्त्र राऊतांनी डागलं आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.