AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 17 मिनिटांत गाठता येणार, नितीन गडकरी यांचा नवीन प्रोजेक्ट काय?

नवी मुंबई विमानतळाजवळ ‘जेटी’ची निर्मिती यापूर्वीच झाली आहे. मुंबई आणि ठाणे परिसराला विशाल समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्राचा जल वाहतुकीसाठी वापर करुन रस्त्यावरील गर्दी आणि प्रदूषण कमी करता येणार आहे. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणे महामार्गावरील गर्दी कमी होणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 17 मिनिटांत गाठता येणार, नितीन गडकरी यांचा नवीन प्रोजेक्ट काय?
water taxi
| Updated on: Nov 19, 2024 | 10:44 AM
Share

Mumbai’s transportation network: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी देशातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणत आहे. काळानुसार त्यांनी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याचा चंग बांधला आहे. आता मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 17 मिनिटांत गाठता येणार आहे. त्यासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला. ठाणे येथे झालेल्या एका प्रचारसभेत गडकरी बोलत होते. नवी मुंबई विमानतळ मार्च 2025 पासून सुरु होण्याची शक्यता आहे.

वॉटर टॅक्सी सेवा सुरु होणार

वाटर टॅक्सी सेवा जगातील अनेक देशांमध्ये आहे. फ्रॉन्स, न्यूझीलंड, अमेरिकासह अनेक देशात वॉटर टॅक्सीमुळे सार्वजनिक वाहतूक होते. भारतात प्रथम वॉटर टॅक्सी सेवा 2020 मध्ये केरळमध्ये सुरु झाली. नितीन गडकरी म्हणाले, नवी मुंबई विमानतळाजवळ ‘जेटी’ची निर्मिती यापूर्वीच झाली आहे. मुंबई आणि ठाणे परिसराला विशाल समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्राचा जल वाहतुकीसाठी वापर करुन रस्त्यावरील गर्दी आणि प्रदूषण कमी करता येणार आहे. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणे महामार्गावरील गर्दी कमी होणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले.

ठाण्यातील प्रश्न कायम

ठाण्यात आता वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न आहे. या ठिकाणी उड्डाण पूल बांधून देखील समस्या कायम आहे. ठाणे, मुंबई, दिल्ली या शहरांची सर्वात मोठी समस्या वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण आहे. मुंबई ठाणे शहराची प्रगती शैक्षणिक क्षेत्रामध्ये होत आहे. यामुळे शिक्षण आणि रोजगारासाठी येथे लोंढे वाढत आहे. या भागातच नव्हे सर्वत्र विकास झाला पाहिजे. आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये पाहिजे तसा रोजगार उपलब्ध झाला नाही.

महाराष्ट्रमध्ये सर्व मोठी उद्योग येत आहेत. 20 हजार कोटींची गुंतवणूक संभाजी नगरमध्ये होत आहे. राज्य आणि प्रशासन कसे असावे आणि ते कसे चालवावे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखे आहे. परंतु गेल्या ६० वर्षांत काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा विकास झाला नाही, अशी टीका नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केली.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.