AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाटकोपरच्या दुर्घटनेवर बोलताना उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले….

Uday Samant on Ghatkopar Hoarding Accident Loksabha Election 2024 : मंत्री उदय सामंत यांनी घाटकोपरच्या दुर्घटनेवर भाष्य केलं आहे. तसंच लोकसभा निवडणुकीवरही उदय सामंत बोलते झाले. तसंच विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलंय. उदय सामंत नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

घाटकोपरच्या दुर्घटनेवर बोलताना उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले....
मंत्री उदय सामंत
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 14, 2024 | 8:25 PM
Share

मुंबईच्या घाटकोपर भागात काल होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना घडली. घाटकोपरच्या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 44 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 240 तक्रारी घाटकोपरच्या होर्डिंग विरोधात कऱण्यात आल्या होत्या. 240 तक्रारी घाटकोपरच्या अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाई नाही. दोन ते अडीच वर्षापासून या तक्रारी करण्यात आल्या होत्या, असं उदय सामंतांनी म्हटलं आहे. तसंच या प्रकरणावरून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भावेश भिंडेला कोणाचा राजश्रय होता? भावेश भिंडे हा प्यादा आहे. या होर्डिंग दुस-याच्या कुणाच्या तरी असू शकतात. जागतिक पातळीवरील सर्वांत मोठं होर्डिंग आहे असं बोललं जात होतं. भावेश भिंडे उबाठात काम करायला तयार झालेला होत्या. भावेश भिंडेला मोठ करण्यात आलेलं आहे. होर्डिंग कंत्राट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे घडला असावा. होर्डिंग प्रकरण बाजूला पडावं म्हणून मुख्यमंत्र्यांवर भूखंड घोटळ्याचे आरोप लावण्यात आले आहेत. घाटकोपर होर्डिंग कोसळून दुर्घटना प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असं उदय सामंत म्हणाले.

मोदीच पंतप्रधान होणार- सामंत

लोकसभा निवडणुकीवर उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावरून उदय सामंत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. स्वप्न पाहिला काही पैसे लागत नाही. स्वप्न कधीही पूर्ण होवू शकतं नाही. 400 आसपास जागा निवडून येवून नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असं उदय सामंत म्हणालेत.

राऊतांच्या पत्रकार परिषदेवर टीका

वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या फोटोखाली काँग्रेसचा हात आहे. होर्डींगच्या बाबतीत राजकारण करण्यात आलं. उबाठाला विलनीकरणाची गरज नाही ती काँग्रेसमध्येच आहे. संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. डॅमेज कंटोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. सकाळची पत्रकार परिषद त्याचाच प्रयत्न होता, असं म्हणत संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर उदय सामंतांनी भाष्य केलं आहे.

Follow Us
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
मोठी बातमी! शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा