AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांवर मोठं संकट, येत्या 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात; धरणांची स्थिती काय?

अल-निनोच्या प्रभावामुळे आणि मान्सून लांबणीवर पडण्याच्या शक्यतेमुळे मुंबईत १ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा प्रस्ताव पालिकेने सादर केला आहे.

मुंबईकरांवर मोठं संकट, येत्या 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात; धरणांची स्थिती काय?
mumbai water lake
| Updated on: Apr 16, 2026 | 11:27 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून मुंबई उन्हाचे चटके बसताना दिसत आहे. यंदा कडक उन्हाळ्यामुळे आणि अल-निनो या हवामान बदलाच्या परिणामामुळे मुंबईवर पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे मुंबईकरांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने येत्या १ मे पासून शहरात १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय विचाराधीन ठेवला आहे. याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

ही कपात का करावी लागत आहे?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमध्ये सध्या ३३.६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी ७ जुलैपर्यंत पुरेल इतके आहे. मात्र, यंदा पाऊस उशिरा येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे जुलै संपल्यानंतर ऑगस्ट महिन्यापर्यंतची सोय करण्यासाठी प्रशासनाला आतापासूनच पाणी जपून वापरणे गरजेचे वाटत आहे. तसेच, वाढत्या उष्णतेमुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. ज्यामुळे पाणीसाठा वेगाने कमी होत आहे.

मुंबईला तानसा, भातसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते. १५ एप्रिल २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार, भातसा धरणामध्ये सर्वात जास्त साठा आहे.

धरणांमधील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये):

  • भातसा: २,३५,४३९
  • मध्य वैतरणा: ६९,१०६
  • अप्पर वैतरणा: ७७,०४५
  • तानसा: ४०,८१७
  • मोडक सागर: ४५,३४०
  • विहार: १५,३५३
  • तुळशी: ३,२७४

मागील वर्षांशी तुलना

यंदाचा साठा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत थोडा जास्त असला तरी तो पूर्णपणे सुरक्षित नाही.

  • २०२६: ३३.६० टक्के
  • २०२५: ३०.२४ टक्के
  • २०२४: २४.५४ टक्के

प्रशासनाचे नियोजन काय?

राज्य सरकारने महापालिकेला जुलैऐवजी ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या १ मेपासून १० टक्के कपात केल्यास, पावसाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांना अखंडित पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असा पालिकेचा विचार आहे. अद्याप पाणी कपातीबद्दल प्रशासनाने अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु पाणी कपात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आतापासूनच पाणी जपून वापरण्यास सुरुवात करावी आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असा सल्ला पालिकेने नागरिकांना दिला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...