AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईवर पाणबाणी? तब्बल 1500 टँकरचा पाणीपुरवठा ‘या’ दिवसापासून बंद; नेमकं कारण काय?

सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीने घातलेल्या अटींची अंमलबजावणी मुंबईमध्ये लागू करण्यास सुरुवात झालेली असताना आता मुंबईवर पाणीबाणी येण्याची शक्यता आहे.

मुंबईवर पाणबाणी? तब्बल 1500 टँकरचा पाणीपुरवठा 'या' दिवसापासून बंद; नेमकं कारण काय?
mumbai water supply cut through tanker
| Updated on: Apr 09, 2025 | 3:40 PM
Share

Mumbai Water Supply : सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीने घातलेल्या अटींची अंमलबजावणी मुंबईमध्ये लागू करण्यास सुरुवात झालेली असताना आता मुंबईवर पाणीबाणी येण्याची शक्यता आहे. कारण आज (9 एप्रिल) मध्यरात्रीपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या सदस्यांनी 1500 टँकरचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ज्या अटी घातल्या आहेत त्या मुंबईत पाळणे अशक्य आहे. त्यामुळे अटींमध्ये सूट मिळायला हवी. नाईलाजाने हा पाणीपुरवठा बंद करावा लागत आहे. यामुळे मुंबईवर मोठा होईल, अशी प्रतिक्रिया टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबईतील विविध भागात आधीच पाणीपुरवठा सुरळीत नसताना वॉटर टँकर बंद झाल्यास मुंबईकरांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईत हॉस्पिटल, गार्डन, रस्त्यांची कामे , उड्डाणपुलाची कामे, इमारती, आरएमसी मिक्सर प्लांट, डीप क्लीनिंग , IPL क्रिकेट मॅच यासाठी पाण्याची मोठी गरज भासते. असे असताना सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीच्या या निर्णयामुळे मुंबईत मोठी पाणीटंचाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सेंट्रल ग्राउंड वॉटर अॅथॉरिटीच्या नियमावली कोणत्या आहेत?

1- 200 चौरस मीटर किंवा त्याहून अधिक आकाराची जमीन टँकरमालकाकडे आवश्यक.

2- टँकरच्या मालकीचा/लीजचा पुरावा आवश्यक

3- सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीचे एनओसी प्रमाणपत्र आवश्यक

4- रोजचा उपसा मोजण्यासाठी ‘डिजिटल वॉटर फ्लो मीटर’ बंधनकारक

5- टँकरद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या ‘बीआयएस’ दर्जा मानकाचे पालन आवश्यक.

6- भूजल उपसण्याचे प्रमाण

दरम्यान, आता या सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीच्या या निर्णयानंतर आता नेमका काय होणार? प्रशासन काही प्रतिबंधात्मक उपाय करणार का? तसेच काही पर्यायी व्यवस्था केली जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

तलावांत 33 टक्के पाणीसाठा

दुसरीकडे कडक उन्हाळ्यात मुंबईला ज्या तलावांतून पाणीपुरवठा केला जातो, त्या धरणांतील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे. सध्या मुंबईला पाणी पुरवणाऱ्या एकूण सात तलावांमध्ये फक्त 33 टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो.

गेल्या वर्षापासून 10 टक्क्यांनी पाणीकपात

मोडक सागर, अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार, भातसा या तलावांतून मुंबईला पाणी पुरवले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईचे विस्तारीकरण होत असल्यामुळे लागणाऱ्या पाण्याचीही मागणी वाढली आहे. त्यामुळेच आता पाणीपुरवठ्यावर तणा येत आहे. गेल्या वर्षांपासून मुंबईला 10 टक्क्यांनी पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. असे असताना या वर्षीही मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांत फक्त 33 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी मे महिन्यात पाणीकपातीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.