AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sameer Wankhede : मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार , समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, नेमकं कारण काय?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपणार असल्याच समोर आलं आहे.

Sameer Wankhede : मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार , समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, नेमकं कारण काय?
समीर वानखेडे यांची चौकशी
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 19, 2021 | 8:51 AM
Share

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपणार असल्याच समोर आलं आहे. समीर वानखेडे यांनी एनसीबीमध्ये कार्यरत राहण्यासाठी मुदतवाढ मागितली नसल्याचं समोर आलं आहे. एनसीबीनं याविषयीची माहिती दिल्याचं ट्विट एनएनआय या वृत्तसंस्थेनं केलं आहे.

समीर वानखेडेंची एनसीबीतील कामगिरी

समीर वानखेडे डेप्युटेशनवर सप्टेंबर 2020 मध्ये एनसीबीच्या मुंबई कार्यालयात रुजू झाले होते.ऑगस्ट ते डिसेंबर 2020 या कालावधीत समीर वानखेडे यांनी 96 जणांना अटक करत 28 केसेस दाखल केल्या. तर 2021 मध्ये त्यांनी 234 लोकांना अटक करत 117 केसेस दाखल केल्या आहेत. वानखेडे यांनी त्यांच्या काळात 1 हजार कोटी रुपयांचं 1791 किलो ड्रग्ज जप्त केलं तर काही संपत्ती देखील जप्त केली.

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन वर कारवाई

समीर वानखेडेंनी एनसीबीमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा रिया चक्रवर्तीला अटक केली होती. समीर वानखे़डे यांच्याकडून त्यानंतर दीपिका पादूकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, भारती सिंग यांना सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनवरुन चौकशीला बोलावण्यात आलं होतं.

आर्यन खान प्रकरणानंतर समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात

समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीवर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर 8 जणांना अटक केली होती. आर्यन खानच्या अटकेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरण हा फर्जीवाडा आणि खंडणीचं प्रकरण असल्याचा आरोप समीर वानखेडेंवर केला होता. आर्यन खान प्रकरणातील साक्षीदारांवरुन देखील वाद निर्माण झाला होता.

वानखेडेंनी मुदतवाढ न मागितल्यानं एनसीबीतील कार्यकाळ संपणार समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस ऑफिसर आहेत. ते सप्टेंबर 2020 मध्ये एनसीबीमध्ये डेप्युटेशनवर रुजू झाले होते. त्यापूर्वी ते डीआरआयमध्ये कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादांच्यापार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्याकडून मुदतवाढ मागण्यात आली नसल्याची माहिती आहे.

इतर बातम्या:

‘तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकलं जातं’, रामदास कदमांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

Omicron Variant : राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव चिंताजनक, नवीन 8 रुग्ण आढळले, एकूण रुग्णांची संख्या 48 वर

Mumbai Zonal Director Sameer Wankhedes tenure to end on 31Dec

Follow Us
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका