AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोकाच्या संघर्षानंतर मनोमिलन? बाळासाहेब थोरात बाजूला, नाना पटोले म्हणतात…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) या दोन्ही बड्या नेत्यांच्या उपस्थित पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली.

टोकाच्या संघर्षानंतर मनोमिलन? बाळासाहेब थोरात बाजूला, नाना पटोले म्हणतात...
| Updated on: Feb 15, 2023 | 6:00 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या (Maharashtra Congress) गोटात आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) या दोन्ही बड्या नेत्यांच्या उपस्थित पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी नाना पटोले यांना थोरांतासोबत मनोमिलन झालं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नाना पटोले आणि थोरात या दोन्ही नेत्यांनी उत्तर दिलं.

विशेष म्हणजे अतिशय हसत-खेळत आणि उत्साहाच्या वातावरणात ही पत्रकार परिषद पार पडली. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांना महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वादावर पडदा पाडण्यात यश आल्याचं चित्र आहे.

दोन्ही नेत्यांचं मनोमिलन झालं का?

मी सुरवातीलाच प्रश्न उपस्थित केला होता. मी सांगितलं की आमच्या काँग्रेस पक्षात कुठेही कुठलाही वाद नाही. नागपूर आणि अमरावतीची निवडणूक जिंकण्यासाठी केलेलं एक वातावरण होतं. त्याचं मी सुरवातीलाच प्रदेशाध्यक्ष म्हणून सुतोवाच केलेलं होतं की आमच्यात कोणताही वाद नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

बाळासाहेबांनी सुद्धा परवा सांगितलं की आमच्यात कुठलाही वाद नाही. पण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.पण हा प्रयत्न फोल ठरला आहे. आता कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीच्या जागा आम्ही जिंकू, असा दावा नाना पटोले यांनी यावेळी केला.

जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे मी कार्यकारिणी बरखास्त केली. कारण जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर कार्यकारिणी बरखास्त करावीच लागते, असं पटोले यांनी यावेळी सांगितलं.

बाळासाहेब थोरात यांचा अपघात झाला. एच. के. पाटील पहिल्यांदा मुंबईत आले तर त्यांच्या घरी गेले. ते सर्वच नेत्यांना भेटले. पण त्यांचा अपघात झाल्याने ते त्यांच्या घरी जाऊन भेटले. तुम्ही समज केला की ते बाळासाहेबांची मनधरणी करायला गेले. आता त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून भेटायला गेले. मी हेच सांगू इच्छितो की, काहीच वादविवाद नाही, असं पटोलेंनी स्पष्ट केलं.

यावेळी पत्रकारांनी पटोले यांना थोरातांच्या राजीनाम्याविषयी आणि नाराजीच्या पत्राविषयी प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरातांनी नाराजीचं पत्र पाठवलं तर त्या पत्राची एक कॉपी तरी दाखवा. त्यांच्या राजीनाम्याचं पत्र तर दाखवा, असं उत्तर दिलं.

यावेळी बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला तेव्हा अध्यक्षांनी चर्चा राष्ट्रीय पातळीवर नेली. तुम्ही खाली कशाला नेता? असं म्हणत बोलणं टाळलं.

Follow Us
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार....
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार.....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची.....
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर.
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?.
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं...
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं....
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट.
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात...
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात....
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा...
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा....
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला.