AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कुणाच्याच घराबाहेर आंदोलन करणं योग्य नाही”, मलिकांचं विधान, राष्ट्रवादीचा काँग्रेसला थेट विरोध?

आंदोलनावरून पुन्हा महाविकास आघाडीतील मतभेद बाहेर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. कारण नवाब मलिक यांनी एक असं वक्तव्य केलंय, ज्यामुळे राष्ट्रवादीचा काँग्रेसला थेट विरोध आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

कुणाच्याच घराबाहेर आंदोलन करणं योग्य नाही, मलिकांचं विधान, राष्ट्रवादीचा काँग्रेसला थेट विरोध?
नवाब मलिक
| Edited By: | Updated on: Feb 14, 2022 | 5:10 PM
Share

मुंबई : पंतप्रधान मोदींनी (Pm Modi Speech) संसदेत काँग्रेसने (Congress) कोरोना पसरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मोदींच्या या वक्तव्याचा विरोध करत काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरावर आंदोलन करण्याचा घाट घातला. मात्र आंदोलन फडणवीसांच्या घराबाहेर पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर काही काळ बाचाबाची झाल्यानंतर, हायव्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर काँग्रेसकडून माघार घेण्यात आली. मात्र याच आंदोलनावरून पुन्हा महाविकास आघाडीतील मतभेद बाहेर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. कारण नवाब मलिक यांनी एक असं वक्तव्य केलंय, ज्यामुळे राष्ट्रवादीचा काँग्रेसला थेट विरोध आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. नेत्यांच्या घराबाहेर आणि पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू नये ही आमच्या पक्षाचीच भूमिका आहे, असे सूचक विधान नवाब मलिक यांनी केले आहे.

काँग्रेसच्या आंदोलनाबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय?

या आंदोलनावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या भूमिकेत भिन्नता दिसून आली आहे. कोणत्याही नेत्याच्या घरावर आंदोलन करण्याची भूमिका योग्य नाही. कुठल्याही पक्षाने कुणाच्या घराबाहेर अथवा एखाद्या पक्षाच्या कार्यालयाबाहेब आंदोलन करु नये. यातून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होते. त्यामुळे हा नवा पायंडा योग्य नाही. कुठल्याही राजकीय पक्षाने हे करू नये. यामुळे प्रशासनावर, पोलिसांवर ताण येतो. त्यामुळे सर्व पक्षांनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे. आंदोलन करायला जागा ठरवून दिली आहे. तिथे आंदोलन केले पाहिजे, असे परखड मत नवाब मलिक यांनी मांडले आहे. त्यामुळे आता याबाबत काँग्रेस काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मोदींच्या काळात घोटाळेबाजांचा सुळसुळाट

तसेच मोदींच्या काळात जास्त घोटाळे झाले, असा आरोपही राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी 23 हजार कोटींची बँक घोटाळा उघडकीस आला आहे. 2015 साली याची तक्रार होऊनही सीबीआयने एवढी वर्ष गुन्हा दाखल केला नाही. सीबीआयने याबाबत गो स्लो भूमिका घेतली. मोदींच्या काळात साडे पाच लाख कोटीचे घोटाळे झाले. घोटाळे करणारे परदेशात लपून बसतायत, त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. अनेक घोटाळ्यात भाजपच्या नेत्यांचा थेट संबंध आहे. भाजपच्या जवळचे लोक कोट्यवधी रुपये खात आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

कितीही वाचवण्याचा प्रयत्न करा, अनिल परबांना तुरुंगात जावंच लागेल; किरीट सोमय्या

माझी पत्रकार परिषद खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, संजय राऊत उद्या काय “बॉम्ब” फोडणार?

VIDEO: तर उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच ‘I Love You’ चा मेसेज पाठवावा लागेल, व्हॅलेंटाईन डे निमित्त शिवेंद्रराजेंची कोपरखळी

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...