AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“धर्मवीर म्हणण्याला समकालीन इतिहासात पुरावे नाहीत”;राष्ट्रवादीच्या खासदाराने संभाजीराजांचं मोठेपण सांगितलं

अभिनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी इतिहासातील दाखले आणि संदर्भ देत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचे त्यांनी समर्थन केले आहे.

धर्मवीर म्हणण्याला समकालीन इतिहासात पुरावे नाहीत;राष्ट्रवादीच्या खासदाराने संभाजीराजांचं मोठेपण सांगितलं
| Updated on: Jan 02, 2023 | 10:52 PM
Share

मुंबईः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या त्या वक्तव्यावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्यातच आता आता अभिनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी इतिहासातील दाखले आणि संदर्भ देत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचे त्यांनी समर्थन केले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजीराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात आणि समर्थनात दोन्हीकडून वाद प्रतिवाद होत आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी इतिहासातील संदर्भ देत संभाजी महाराज हे धर्मवीर होते असा कोणताही पुरावा समकालीन इतिहासात उपलब्ध नाही. मात्र छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते हे त्या त्या काळातील इतिहासावरून स्पष्ट होते अशी माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.

खासदार अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराज यांच्या काळातील इतिहास सांगताना समकालीन इतिहासाचा संदर्भ दिला आहे. ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते आणि हीच बिरुदावली व्यापक असल्याचे त्यांनी् म्हटले आहे.

कारण त्या काळातील इतिहासामध्ये, बखरीमध्ये संभाजी महाराज यांचा इतिहास लिहिताना इतिहासकारानी देव, देश आणि धर्म हे स्वराज्य होते, आणि त्यातच संभाजी महाराज यांनी आपले शौर्यही गाजवले आहे त्यामुळेच संभाजीराजे हे धर्मवीर नव्हे तर ते स्वराज्यरक्षकच होते असाही त्यांनी दावा केला आहे.

त्या बरोबरच संभाजी महाराज यांचा त्या काळात लिहिलेल्या गेलेल्या इतिहासावर धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक असचं चित्र त्यावेळीही रेखाटले असल्याचे मत खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.