AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानदेखील उतरू शकेल असे रस्ते बांधले, विकास झाला पाहिजे पण वरवर काम करून चालणार नाही; नितीन गडकरींच्या कानपिचक्या

केवळ राज्याचा विकास झाला पाहिजे असं म्हणून चालणार नाही. राज्याचा विकास झाला पाहिजे तर वरवर काम करून चालणार नाही. त्यासाठी गंभीरपणे काम केलं पाहिजे, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.

विमानदेखील उतरू शकेल असे रस्ते बांधले, विकास झाला पाहिजे पण वरवर काम करून चालणार नाही; नितीन गडकरींच्या कानपिचक्या
नितीन गडकरी
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 5:12 PM
Share

मुंबई: केवळ राज्याचा विकास झाला पाहिजे असं म्हणून चालणार नाही. राज्याचा विकास झाला पाहिजे तर वरवर काम करून चालणार नाही. त्यासाठी गंभीरपणे काम केलं पाहिजे, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी सांगितलं. आम्ही देशभरात रस्त्यांचं जाळं निर्माण केलं आहे. देशातील 20 रस्ते असे आहेत की तिथे विमान सुद्धा उतरू शकतं, असं गडकरी यांनी सांगितलं. आपण संपूर्ण महाराष्ट्राचा (maharashtra) विचार केला पाहिजे. मी राज्यात 5 लाख कोटींचे रस्ते (road) बनवले आहेत. 1947 साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 75 टक्के लोक गावात राहत होते. मात्र आता 25 टक्के लोक गावात राहतात. गावात सोयीसुविधा आणि साधन नसल्याने नाईलाजाने लोक शहरात आलीत. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागाची परिस्थिती खराब आहे तीच परिस्थिती गडचिरोली जिल्ह्याची आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं.

नितीन गडकरी यांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. मी देशात असे 20 रस्ते बांधले जिथे विमान देखील उतरू शकतं. सांगलीत एक लॉजिस्टिक पार्क बांधणार आहोत, तिथल्या रस्त्यावर विमान देखील उतरेल. वॉटर टॅक्सी सुरू करायच्या आहेत. ज्या दक्षिण मुंबईतून 13 मिनिटात नवी मुंबई एअरपोर्टला जातील, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

तांदूळ-मक्यापासून इथेनॉल तयार करणार

यावेळी त्यांनी इथेनॉलबाबतची चिंताही व्यक्त केली. आज देशात साडे चारशे कोटीच्या इथोनॉलची गरज आहे. पेट्रोलमध्ये टाकण्यासाठी 10 टक्के इथेनॉलही आपल्याकडे नाही. पेट्रोलवर चालणारी वाहने आता 100 टक्के बायो इथेनॉलवर चालू शकतात. आता आम्ही मका आणि तांदूळ यापासून इथेनॉल बनवण्याची परवानगी दिली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची मुख्य समस्या म्हणजे आपण आपली पॉवर खर्च करत आहोत, असं नितीन गडकरी म्हणाले.

संबंधित बातम्या:

#LataMangeshkar : लता मंगेशकर व्हेंटिलेटरवर; लवकर बऱ्या व्हा, सोशल मीडियावर लोक करताहेत प्रार्थना

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला अपघात, “कार उद्ध्वस्त झाली, जीव वाचला” अपघातानंतर भावूक पोस्ट

भारतातली सर्वात महागडी कार मुकेश अंबानींच्या ताफ्यात, किंमत ऐकून थक्क व्हाल! केवळ VIP नंबरसाठी 12 लाख

Follow Us
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.