AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update | दिलासा! विलगीकरणातून बरे झालेल्यांची संख्याही वाढली; मुंबई महापालिकेचं मोठं यश

आतापर्यंत बाधितांच्या संपर्कात आलेल्यांपैकी 33 लाख 71 हजारांहून अधिक संशयित विलगीकरणातून मुक्त झाले आहेत.

Corona Update | दिलासा! विलगीकरणातून बरे झालेल्यांची संख्याही वाढली; मुंबई महापालिकेचं मोठं यश
| Updated on: Nov 09, 2020 | 5:13 PM
Share

मुंबई : एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलेल्या संशयितांचा आकडाही मोठा आहे. आतापर्यंत बाधितांच्या संपर्कात आलेल्यांपैकी 33 लाख 71 हजारांहून अधिक संशयित विलगीकरणातून मुक्त झाले आहेत (Number Of Those Who Recovered From Quarantined Increased).

मात्र, कोरोनाचा संसर्ग पसरु नये यासाठी आजघडीला सव्वाचार लाखांहून अधिक व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. संसर्गावर नियंत्रण मिळावे यादृष्टीने कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा मोठ्या संख्येने शोध घेण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले होते.

त्यानुसार, संशयित रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत 38 लाख 4 हजार 170 संशयित रुग्ण पालिकेला सापडले आहेत. यापैकी 16 लाख 40 हजार 748 संशयित रुग्ण अतिजोखमीच्या, तर 21 लाख 63 हजार 422 कमी जोखमीच्या गटात होते.

या शोधमोहिमेत सापडलेल्या 33 लाख 71 हजार 112 संशयित रुग्णांचा विलगीकरणाचा काळ पूर्ण झाला असून विलगीकरणातून ते मुक्त झाले आहेत. ही एक दिलासादायक बाब आहे.

मुख्यमंत्र्यांचा जनतेला सतर्कतेचा इशारा

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला. जगभरात येत असलेली  कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, असा इशारा देतानाच मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Number Of Those Who Recovered From Quarantined Increased

संबंधित बातम्या :

गोविंदबागेत दिवाळी साध्या पद्धतीने, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम रद्द

कोरोनाचा फटका, नागपूरमध्ये फटाके व्यावसायिकांची संख्या घटली, महापालिकेकडून 582 जणांना परवानगी

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.