Devendra Fadnavis: ‘ते तर सीरीयल लायर्स’, फडणवीसांचा मोठा हल्लाबोल, ओपन चॅलेंजविषयी म्हणाले काय?
Devendra Fadnavis on Opposition Leader: महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारीच आता विरोधकांविरोधात रस्त्यावर उतरत रान पेटवणार आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या मुद्यावरून विरोधकांवर मोठी टीका केली आहे.

Devendra Fadnavis on Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक बिल गेल्या आठवड्यात लोकसभेत नामंजूर झाले. सत्ताधाऱ्यांनी आता विरोधकांविरोधात मोर्चा उघडला आहे. सत्ताधारीच विरोधकांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. दोन्ही गटात कलगीतुरा रंगला आहे. लोकसभेतील लढाई रस्त्यावर आली आहे. तोच धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता काँग्रेससह विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. त्यांनी सत्ताधारी हे सातत्याने खोटे बोलत असल्याची जहरी टीका केली आहे.
तरुणांना अर्बन नक्षलवादाचा धोका
युवा शक्ती जागर यात्रा काढत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णराज महाडिक यांचे अभिनंदन केले.महाराष्ट्र पिंजून काढण्याचा प्रयत्न ते करत आहेत. राज्यात सामाजिक आणि आर्थिक प्रश्न आहेत. ज्यांनी काम केले आहे, ज्या उत्तम संस्था व विविध घटक आहेत. अशा सगळ्या घटकांपर्यंत ही यात्रा नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. युवा शक्तीला जागृत करून राष्ट्रीय विचाराने प्रेरित करायचे काम हे जागर यात्रेतून होणार आहे, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांच्या आतील आहे. ही युवा शक्ती संघटित करून एका दिशेने नेऊ शकलो तर एक परिवर्तन महाराष्ट्रात करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युवा शक्ती जागर यात्रेनिमित्ताने फडणवीस यांनी अर्बन नक्षलवादावर निशाणा साधला. एकीकडे मोठ्या प्रमाणात अराजकतावादी शक्ती, ज्याला अर्बन नक्षलवादी विचार आहेत. त्या शक्ती युवकांमध्ये अराजकतेचा विचार विषयाप्रमाणे पेरत आहेत. महाविद्यालयातून संविधान व देशा विरुद्ध कलुषित करायचे काम सुरू आहे , असा गंभीर आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. त्यामुळे संविधानाप्रती तरुणांना जागृत करण्याचे काम या यात्रेतून होईल. सकारात्मक शक्ती संघटित करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात गेल्यामुळे वैयक्तिक प्रगल्भता एक नेता म्हणून होईल. त्याचा फायदा युवा मोर्चा मोठा करण्यासाठी होईल, असे ते म्हणाले.
विरोधक सीरीयल लायर
एक सूचना करतो, ज्याप्रमाणे भारतीय संसदेत महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या झाली त्याचाही जागर करा. विरोधक हे रोज खोटे बोलत आहेत. २०२३ साली विधेयक मंजूर झाले. त्यानंतर कधीपासून ते लागू करायचे याचे संविधान संशोधन झाले होते. त्यावेळी बिलाला समर्थन केले, कारण त्यावेळी भाजपकडे बहुमत होते. आता दोन तृतीयांश बहुमत नाही, तर त्यांनी आता खरे दात दाखवले आहेत, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.
या बिलाला विरोध करून नारी शक्ती व लोकशाहीचा अपमान विरोधी पक्षांनी केला आहे. रोज खोटे बोलतात. डिलिमेटशन, सेन्सस बाबत खोटे बोलतात. संविधानाने टाकलेली जबाबदारी काय, हे अमित शाह यांनी स्पष्ट केले. एक तासात विरोधकांनी सुचवलेले सुधारणा करायची तयारी दाखवली होती. पण त्यांना महिला आरक्षण लागू करायचे नाही. तुमच्या मानसिकतेविरुद्ध आमचा लढा सुरू आहे. जोपर्यंत ३३ टक्के महिला संसदेत पोहोचणार नाही. सीरियल लायर्सला मी सांगतो. कितीही खोटे बोललो, तरी झूठ की उमर बडी नही होती, सच कभी समाप्त नही होता, असा सज्जड इशारा त्यांनी विरोधकांना दिला. तर विरोधकांशी डिबेट कधी करणार याविषयी ते काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.