AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray: ‘जिथं जास्त बोली, तिथं राजकारणी’; IPL चा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी नेमकं डिवचलं कुणाला? इंडियन पॉलिटिकल लीगची तुफान चर्चा

Uddhav Thackeray on IPL :देशात आयपीएलचा ज्वर चढला आहे. आयपीएलच्या सामन्यांची सगळीकडे चर्चा असतानाच नेमका हाच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी राजकारण्यांना चिमटा काढला आहे. त्यांच्या या फटकेबाजीची राज्यात चर्चा सुरू आहे. त्यांनी नेमका कुणाला चिमटा काढला याची चर्चा रंगली आहे.

Uddhav Thackeray: 'जिथं जास्त बोली, तिथं राजकारणी'; IPL चा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी नेमकं डिवचलं कुणाला? इंडियन पॉलिटिकल लीगची तुफान चर्चा
उद्धव ठाकरेImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 21, 2026 | 9:24 AM
Share

Uddhav Thackeray on Indian Political League: देशात आयपीएलचा ज्वर अनेकांना चढला आहे. आयपीएलचे सामने चाहते डोळ्यात तेल घालून पाहत आहेत. आपला संघ हरल्यावर ते लागलीच दुसर्‍या संघाला प्रोत्साहन देत आहेत. तर गेल्या आयपीएलमध्ये एका संघाकडून खेळलेला खेळाडू यावेळी दुसर्‍या संघात खेळताना दिसत आहे. नेमका हाच धागा पकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयाराम-गयारामांना जमके टोला लगावला आहे. त्यांनी सध्याच्या राजकारणावरून जोरदार टोलेबाजी केली आहे. IPL चा उल्लेख करत त्यांनी कुणाला तो चिमटा लावला आणि कुणाला टोला लगावला याची चर्चा रंगली आहे.

‘जिथं जास्त बोली, तिथं राजकारणी’

आता IPL सारखी राजकारणातही बोली लावली जाते अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आयपीएलमध्ये कोणता खेळाडू कोणत्या संघाकडून खेळेल हे कळत नाही. मागेही मी एकदा बोललो होतो की अनेकदा आपण टीव्हीवरती सामना बघत असताना आपण म्हणतो की हा आपला खेळाडू आहे, आता तो त्या संघाकडून खेळतोय. कारण तिकडे सुद्धा बोली लागते आणि आता राजकारणात सुद्धा बोली लागायला लागली आहे. ज्याची बोली अधिक तिकडे खेळाडू जातात, असा टोला त्यांनी राजकारण्यांना लगावला.

विक्रोळी, भांडूपमधील लोकांनी आपला भगवा आणि मराठी बाणा कायम ठेवला याचा मला आनंद आहे, असे ठाकरे म्हणाले. बंगालमध्ये सगळे बंगाली एकवटलेत, तामिळनाडूत तामिळी एकवटलेत तसेच महाराष्ट्रात सुद्धा मराठी माणूस एकवटल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तर यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील 9 सदस्यांना निरोप देण्यात आला. निरोप समारंभाच्या कार्यक्रमातही उद्धव ठाकरे यांनी कविता, शेर सादर करत भाषण गाजवले होते. त्यांनी सध्याच्या राजकारणाची तुलना ही आयपीएलशी केली. इंडियन पॉलिटिकल लीग सुरू झाली आहे का असा चिमटा त्यांनी काढला होता. शिवसेना फुटीनंतर आणि राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली.  उद्धव ठाकरे यांचा कालच्या सभेतील चिमटा कुणाला होता हे वेगळं सांगायची गरज नाही.

Follow Us
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?