AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray: ‘जिथं जास्त बोली, तिथं राजकारणी’; IPL चा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी नेमकं डिवचलं कुणाला? इंडियन पॉलिटिकल लीगची तुफान चर्चा

Uddhav Thackeray on IPL :देशात आयपीएलचा ज्वर चढला आहे. आयपीएलच्या सामन्यांची सगळीकडे चर्चा असतानाच नेमका हाच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी राजकारण्यांना चिमटा काढला आहे. त्यांच्या या फटकेबाजीची राज्यात चर्चा सुरू आहे. त्यांनी नेमका कुणाला चिमटा काढला याची चर्चा रंगली आहे.

Uddhav Thackeray: 'जिथं जास्त बोली, तिथं राजकारणी'; IPL चा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी नेमकं डिवचलं कुणाला? इंडियन पॉलिटिकल लीगची तुफान चर्चा
उद्धव ठाकरेImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 21, 2026 | 9:24 AM
Share

Uddhav Thackeray on Indian Political League: देशात आयपीएलचा ज्वर अनेकांना चढला आहे. आयपीएलचे सामने चाहते डोळ्यात तेल घालून पाहत आहेत. आपला संघ हरल्यावर ते लागलीच दुसर्‍या संघाला प्रोत्साहन देत आहेत. तर गेल्या आयपीएलमध्ये एका संघाकडून खेळलेला खेळाडू यावेळी दुसर्‍या संघात खेळताना दिसत आहे. नेमका हाच धागा पकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयाराम-गयारामांना जमके टोला लगावला आहे. त्यांनी सध्याच्या राजकारणावरून जोरदार टोलेबाजी केली आहे. IPL चा उल्लेख करत त्यांनी कुणाला तो चिमटा लावला आणि कुणाला टोला लगावला याची चर्चा रंगली आहे.

‘जिथं जास्त बोली, तिथं राजकारणी’

आता IPL सारखी राजकारणातही बोली लावली जाते अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आयपीएलमध्ये कोणता खेळाडू कोणत्या संघाकडून खेळेल हे कळत नाही. मागेही मी एकदा बोललो होतो की अनेकदा आपण टीव्हीवरती सामना बघत असताना आपण म्हणतो की हा आपला खेळाडू आहे, आता तो त्या संघाकडून खेळतोय. कारण तिकडे सुद्धा बोली लागते आणि आता राजकारणात सुद्धा बोली लागायला लागली आहे. ज्याची बोली अधिक तिकडे खेळाडू जातात, असा टोला त्यांनी राजकारण्यांना लगावला.

विक्रोळी, भांडूपमधील लोकांनी आपला भगवा आणि मराठी बाणा कायम ठेवला याचा मला आनंद आहे, असे ठाकरे म्हणाले. बंगालमध्ये सगळे बंगाली एकवटलेत, तामिळनाडूत तामिळी एकवटलेत तसेच महाराष्ट्रात सुद्धा मराठी माणूस एकवटल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तर यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील 9 सदस्यांना निरोप देण्यात आला. निरोप समारंभाच्या कार्यक्रमातही उद्धव ठाकरे यांनी कविता, शेर सादर करत भाषण गाजवले होते. त्यांनी सध्याच्या राजकारणाची तुलना ही आयपीएलशी केली. इंडियन पॉलिटिकल लीग सुरू झाली आहे का असा चिमटा त्यांनी काढला होता. शिवसेना फुटीनंतर आणि राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली.  उद्धव ठाकरे यांचा कालच्या सभेतील चिमटा कुणाला होता हे वेगळं सांगायची गरज नाही.

Follow Us
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू.
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल.
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण....
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती.
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी.
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर.
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष.
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव.
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले