AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचं निधन

दलित पँथरचे संस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचं निधन झालं. मंगळवारी (16 जुलै) सकाळी साडे पाचच्या सुमारास विक्रोळी येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचं निधन
| Updated on: Jul 16, 2019 | 9:20 AM
Share

मुंबई : दलित पँथरचे संस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचं निधन झालं. मंगळवारी (16 जुलै) सकाळी साडे पाचच्या सुमारास विक्रोळी येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजा ढाले यांच्या निधनाची माहिती मिळताच आंबेडकरी जनतेत दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला, अशी भावना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

बुधवारी (17 जुलै) दुपारी 12 वाजता विक्रोळीतील निवसस्थानाहून त्यांची अंतयात्रा निघेल. दादरमधील चैत्यभूमी येथील इलेक्ट्रीक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

राजा ढाले याचां थोडक्यात परिचय

1940 मध्ये राजा ढाले यांचा जन्म झाला. राजा ढाले हे आंबेडकरी चळवळीतील एक भारतीय नेते आणि ज्येष्ठ विचारवंत, लेखक  आणि राजकारणी होते. त्यांनी अरुण कृष्णाजी कांबळे आणि नामदेव ढसाळ यांच्या मदतीने ‘दलित पँथर’ नावाची एक सामाजिक संघटना स्थापन केली. त्याअगोदर राजा ढाले हे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (भारिप) प्रमुख होते.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.