AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राजू शेट्टींना आमदारकी मिळाली नाही म्हणून आता ते लॉकडाऊनविरुद्ध बोलतायत’

उद्धव ठाकरे लॉकडाऊनचा निर्णय आनंदाने घेत नाहीत, हे मान्य आहे. पण मग जनता तरी त्यांच्या राजवटीत कुठे आनंदात राहत आहे. | atul bhatkhlkar

'राजू शेट्टींना आमदारकी मिळाली नाही म्हणून आता ते लॉकडाऊनविरुद्ध बोलतायत'
राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
| Updated on: Apr 04, 2021 | 3:32 PM
Share

मुंबई: राजू शेट्टी यांनी लॉकडाऊनविरोधात (Lockdown) घेतलेली भूमिका ही पश्चातबुद्धी आहे. महाविकासआघाडीने त्यांना राज्यपाल कोट्यातून उमेदवारी दिली नाही म्हणून त्यांना आता हे ज्ञान आले आहे, अशी खोचक टिप्पणी भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली. (BJP leader Atul Bhatkhalkar slams Raju Shetty over Lockdown comment)

ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाला पुन्हा एकदा विरोध दर्शविला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनचा निर्णय आनंदाने घेत नाहीत, हे मान्य आहे. पण मग जनता तरी त्यांच्या राजवटीत कुठे आनंदात राहत आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर पॅकेज जाहीर करून लोकांच्या खात्यात पैसे टाका. राज्य सरकारकडे मनरेगा आणि जनधन योजनेचा पूर्ण डेटा उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करुन लोकांच्या खात्यावर 5 हजार रुपये जमा केले जाऊ शकतात, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले.

‘मोदी सरकारने गरिबांना पॅकेज दिले, राऊतांची स्मरणशक्ती तोकडी’

देशव्यापी लॉकडाऊनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. मात्र, संजय राऊत यांची स्मरणशक्ती तोकडी आहे. केंद्र सरकारने राज्यांना कर्ज काढण्याची मुभा दिली आहे. मात्र, हा पर्याय न स्वीकारणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. भाजपच्या नेत्यांचं नको पण सरकारने किमान पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे ऐकावे. त्यांनीही लॉकडाऊन झाल्यास आर्थिक पॅकेज देण्याचा प्रस्ताव मांडल्याचे अतुल भातखळकर यांनी सांगितले.

राजू शेट्टी काय म्हणाले होते?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर आधी शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा, ज्यांचे रोजगार बुडणार आहेत त्यांना भरपाई द्यावी. तरच लॉकडाऊन करावा. हे जमत नसेल तर आम्हाला आमच्या नशीबावर सोडून द्या. आमचं आम्ही पाहून घेऊ, असं राजू शेट्टी यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

लॉकडाऊन की कठोर निर्बंध?, मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक; संध्याकाळपर्यंत नवी गाईडलाईन जारी होणार?

Mumbai Corona: गर्दी अशीच राहिली तर मुंबईबाबत आजच्या आजच कठोर निर्णय; अस्लम शेख यांचं मोठं विधान

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी 4000 बेड शिल्लक, आवडत्या रुग्णालयाची वाट न पाहण्याचं आवाहन

(BJP leader Atul Bhatkhalkar slams Raju Shetty over Lockdown comment)

Follow Us
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने...
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने....
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं.
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक......
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक.......
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP...
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP....
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो.
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे...
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे....