AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राजू शेट्टींना आमदारकी मिळाली नाही म्हणून आता ते लॉकडाऊनविरुद्ध बोलतायत’

उद्धव ठाकरे लॉकडाऊनचा निर्णय आनंदाने घेत नाहीत, हे मान्य आहे. पण मग जनता तरी त्यांच्या राजवटीत कुठे आनंदात राहत आहे. | atul bhatkhlkar

'राजू शेट्टींना आमदारकी मिळाली नाही म्हणून आता ते लॉकडाऊनविरुद्ध बोलतायत'
राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
| Updated on: Apr 04, 2021 | 3:32 PM
Share

मुंबई: राजू शेट्टी यांनी लॉकडाऊनविरोधात (Lockdown) घेतलेली भूमिका ही पश्चातबुद्धी आहे. महाविकासआघाडीने त्यांना राज्यपाल कोट्यातून उमेदवारी दिली नाही म्हणून त्यांना आता हे ज्ञान आले आहे, अशी खोचक टिप्पणी भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली. (BJP leader Atul Bhatkhalkar slams Raju Shetty over Lockdown comment)

ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाला पुन्हा एकदा विरोध दर्शविला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनचा निर्णय आनंदाने घेत नाहीत, हे मान्य आहे. पण मग जनता तरी त्यांच्या राजवटीत कुठे आनंदात राहत आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर पॅकेज जाहीर करून लोकांच्या खात्यात पैसे टाका. राज्य सरकारकडे मनरेगा आणि जनधन योजनेचा पूर्ण डेटा उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करुन लोकांच्या खात्यावर 5 हजार रुपये जमा केले जाऊ शकतात, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले.

‘मोदी सरकारने गरिबांना पॅकेज दिले, राऊतांची स्मरणशक्ती तोकडी’

देशव्यापी लॉकडाऊनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. मात्र, संजय राऊत यांची स्मरणशक्ती तोकडी आहे. केंद्र सरकारने राज्यांना कर्ज काढण्याची मुभा दिली आहे. मात्र, हा पर्याय न स्वीकारणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. भाजपच्या नेत्यांचं नको पण सरकारने किमान पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे ऐकावे. त्यांनीही लॉकडाऊन झाल्यास आर्थिक पॅकेज देण्याचा प्रस्ताव मांडल्याचे अतुल भातखळकर यांनी सांगितले.

राजू शेट्टी काय म्हणाले होते?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर आधी शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा, ज्यांचे रोजगार बुडणार आहेत त्यांना भरपाई द्यावी. तरच लॉकडाऊन करावा. हे जमत नसेल तर आम्हाला आमच्या नशीबावर सोडून द्या. आमचं आम्ही पाहून घेऊ, असं राजू शेट्टी यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

लॉकडाऊन की कठोर निर्बंध?, मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक; संध्याकाळपर्यंत नवी गाईडलाईन जारी होणार?

Mumbai Corona: गर्दी अशीच राहिली तर मुंबईबाबत आजच्या आजच कठोर निर्णय; अस्लम शेख यांचं मोठं विधान

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी 4000 बेड शिल्लक, आवडत्या रुग्णालयाची वाट न पाहण्याचं आवाहन

(BJP leader Atul Bhatkhalkar slams Raju Shetty over Lockdown comment)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.