AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आडवणींकडे पाहिल्यावर कैदेतील शहाजहानची आठवण, सामनामधून निशाणा

Sanjay Raut Rokhthok : औरंगजेब चारशे वर्षांपासून थडग्यात विसावला आहे. त्या थडग्यावरून महाराष्ट्रात हिंसा घडवून आणण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी नागपूरची कोणी निवड केली असा सवाल खासदार संजय राऊत यांनी सामानातील रोखठोकमधून केला आहे.

आडवणींकडे पाहिल्यावर कैदेतील शहाजहानची आठवण, सामनामधून निशाणा
संजय राऊतांचा रोखठोकImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 23, 2025 | 10:13 AM
Share

औरंगजेबाची कबर ही राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आली. त्यानंतर नागपूरमधील हिंसाचार उफाळला. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. या सर्व घडामोडींचा समाचार खासदार संजय राऊत यांनी सामानाच्या रोखठोकमधून घेतला आहे. त्यांनी याप्रकरणात भाजपवर निशाणा साधतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी नागपूरची कोणी निवड केली असा सवाल विचारला आहे. ज्यांना औरंगजेबाचे थडगे पाडायचे आहे, त्यांना दख्खनमधील ताजमहालही उखडायचा आहे का? असा रोकडा सवाल त्यांनी केला. औरंगजेबाच्या नावाने राज्यात राजकारण होणे हे योग्य नाही, अशी टीका राऊतांनी केली.

थडग्यातील औरंगजेब जिवंत केला

संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये, थडग्यातील औरंगजेब जिवंत केला या शीर्षकाखाली भाजपवर निशाणा साधला. औरंगजेबाच्या नावावरून नागपूरची युद्धभूमी केली का असा प्रश्न त्यांनी केला. त्यांनी गृहखात्यावर सुद्धा टीका केली. औरंगजेबाच्या इतिहासाचा धांडोळा घेत या रोखठोकमधून भाजपाच्या धोरणावर त्यांनी टीका केली. नवहिंदुत्ववाद्यांना देशात अराजक माजवायचे असल्याचा आरोप त्यांनी केला.

अडवणींवरून भाजपावर निशाणा

औरंगजेब हा क्रूर होताच. त्याने त्याचा बाप, भाऊ यांना तुरूंगात डांबले अथवा खतम केले. ब्रिटिश शासनकर्ते सुद्धा क्रूरच होते. मोगलांच्या खुणा आपण नष्ट करत आहोत, पण ब्रिटिशांच्या खुणा जतन करून ठेवल्या आहेत. लालकृष्ण अडवाणी यांची स्थिती पाहिल्यावर अनेकांना कैद झालेल्या शहाजहानची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अशी टीका सामन्यातून करण्यात आली.

तैमूर नावावरून साधला निशाणा

तुजुक ए तैमुरी या तैमूर याच्या आत्मकथेवरून त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर निशाणा साधला. भारतात आपण पर्यटनासाठी आलो नाही तर काफिरांना मारण्यासाठी, त्यांची संपत्ती लुटण्यासाठी आल्याचे तैमूरने सांगितले आहे. तरीही देशातील एका प्रख्यात सिने कुटुंबाने त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवले आणि पंतप्रधानांनी त्याचे कौतुक केले, असा टोला रोखठोकमधून लगावण्यात आला. तर बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगजेबाची कबर खोदण्यास सांगितले नाही तर औरंगबादाचे नाव बदलून टाकले, याची आठवण त्यांनी करून दिली.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?