AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरविंद केजरीवाल प्रकरणात कोर्टाची ईडी, सीबीआयला चपराक- संजय राऊत

गेल्या काही वर्षांत देशात डोंबारीचा खेळ सुरु आहे. त्यात अनेक विरोधकांना अटक केली आहे. गेल्या दहा वर्षांत घटनात्कम संस्था मोदी, शाहाच्या कठपुतली बाहुल्या झाल्या होत्या. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना बहुमतावरुन जनतेने खाली खचले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल प्रकरणात कोर्टाची ईडी, सीबीआयला चपराक- संजय राऊत
sanjay raut
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 21, 2024 | 11:09 AM
Share

शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला चढवला. अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर होती, हे कोर्टात सिद्ध झाले आहे. त्यांची कोर्टाने मुक्ताता केली आहे. यापूर्वी माझी आणि अनील देशमुख यांची अटक कोर्टाने बेकायदेशीर ठरवली होती. या तिन्ही प्रकरणातून मोदी सरकार तपास संस्थांचा वापर विरोधकांना दाबण्यासाठी करत आहे, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे जनतेने मोदी यांना बहुमत दिले नाही. आता हे सरकार टेकूवरचे सरकार आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मोदींचा योगा दहा वर्षांपासून देश पाहत आहे

राज्यात कोयता गँग सक्रीय आहे. या सरकारमध्ये त्यांना पाठिंबा देणारे लोक आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त मोदी यांनी योगा केला. त्यांचा हा योगा देश पाहणार आहे. देश गेल्या दहा वर्षांपासून तेच पाहत आहे. मुख्यमंत्र्यांनी योगा केला. उपमुख्यमंत्र्यांनी योगा केला. चांगली गोष्ट आहे, असा उपरोधिक टोला संजय राऊत यांनी लगावला.

यामुळे केजरीवाल यांना अटक

अनिल देशमुख, संजय राऊत असो की अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडे जनता होती. अरविंद केजरीवाल यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे. अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांना यश मिळू दिले नाही, त्यामुळे खोट्या प्रकरणाची उभारणी करुन त्यांना अटक केली.

गेल्या काही वर्षांत देशात डोंबारीचा खेळ सुरु आहे. त्यात अनेक विरोधकांना अटक केली आहे. गेल्या दहा वर्षांत घटनात्कम संस्था मोदी, शाहाच्या कठपुतली बाहुल्या झाल्या होत्या. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना बहुमतावरुन जनतेने खाली खचले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांचे शिवसेना उबाठाकडून आम्ही अभिनंदन करतो. त्याच्या सुटकेमुळे ईडी अन् सीबीआय सारख्या संस्थांना चपराक आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता