AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आतली बातमी, महाविकास आघाडीचं ठरलं! आता जागावाटपासाठी बैठक होणार नाही

महाविकास आघाडीची आज जागावाटपाबाबत बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत नेमकं काय ठरलं, याबाबतची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

आतली बातमी, महाविकास आघाडीचं ठरलं! आता जागावाटपासाठी बैठक होणार नाही
| Updated on: Feb 28, 2024 | 9:22 PM
Share

मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 : महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीकडून मविआला 27 जागांची यादी देण्यात आली. त्यामुळे वंचितकडून 27 जागांचा प्रस्ताव दिला गेला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. पण मविआच्या बैठकीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. वंचितकडून 27 जागांसाठी प्रस्ताव देण्यात आलेला नाही. त्यांच्याकडून फक्त इच्छा व्यक्त करण्यात आली आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे आजची बैठक ही जागावाटपाची शेवटची बैठक होती. यापुढे एकही बैठक होणार नाही. आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात अंतिम बैठक होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

“महाविकास आघाडीची आजची बैठक ही निर्णायकच झाली आहे. तीनही पक्षांचे प्रमुख नेते आजच्या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत काय चाललंय याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दूरध्वनीवरुन सातत्याने घेत होते. जागावाटप अत्यंत सुरळीत पार पडलेलं आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तीनही पक्षांत कोणतेही मतभेद नाहीत. वंचित बहुजन आघाडीचा आज जो प्रस्ताव आलेला आहे तो प्रस्ताव तुम्हाला दिसायला खूप मोठा कागद दिसत असला तरी त्यांनी गेल्या काही वर्षात काही मतदारसंघात काम केलं, त्यांनी त्या मतदारसंघाची यादी दिलेली आहे. त्याच्यावर आम्ही चर्चा करु. शेवटी आम्हाला सगळ्यांना या देशात लोकशाही, संविधान, वंचितांचं रक्षण करणं हा आमचा अजेंडा आहे”, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

‘वंचितने 27 जागांचा फॉर्म्युला…’

“आम्ही सर्वांना सविस्तर प्रत्येक जागेवर चर्चा केली. कोण कुठे जिकेंल यावर चर्चा केली. जिंकणं महत्त्वाचं आहे. कोण किती जागा लढतंय याला महत्त्व नाही. प्रकाश आंबेडकर यांची सुद्धा हीच भूमिका आहे. त्यांनी 27 जागांचा फॉर्म्युला अजिबात सांगितलेला नाही. इच्छा व्यक्त केलेली नाही”, असं राऊतांनी स्पष्ट केलं. “आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात काम करतो. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी महाराष्ट्रभरात आहे. पण शेवटी महाराष्ट्रात जागा 48च आहेत. त्या आम्हाला वाटून घ्यायच्या आहेत. ज्याची ताकद ज्या मतदारसंघात आहे त्यावर आम्ही चारही पक्ष चर्चा करतोय. या बैठकीत काँग्रेसचे अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते”, असं राऊत म्हणाले.

‘आता कोणतीही बैठक होणार नाही’

“आमच्याकडे वंचितच्या 27 जागांचा प्रस्ताव नाही. आम्ही फक्त जागावाटपावर बोलतोय. महाराष्ट्रात दोन दिवसांत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल. आता कोणतीही बैठक होणार नाही. याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीसह जागावाटप पार पडलेलं आहे. पुढे अजिबात बैठक होणार नाही. यापुढे शेवटची बैठक ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक होईल. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली जाईल आणि तेव्हा जागावाटप जाहीर केली जाईल”, अशी माहिती संजय राऊतांनी यावेळी दिली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.