बिरबलच्या मृत्यूनंतर अकबराचे काय हाल झाले? 99 टक्के लोकांना हे गुपित माहितीच नाही!
अकबर आणि बिरबल यांच्या कथा तुम्ही लहाणपणी वाचल्या आणि ऐकल्या असतील. बिरबल हा खूपच चतूर होता. परंतु त्याचा मृत्यू कसा झाला हे अनेकांना माहिती नाही.

Akbar And Birbal : अकबर आणि बिरबलाच्या अनेक कथा आज प्रसिद्ध आहे. अनेकदा तुम्ही बिरबल आणि अकबराचे विनोद ऐकले असतील. बिरबलाकडे खूप बुद्धीचातूर्य होते, असे म्हटले जाते. बिरबल हा बादशाहा अकबाराचा अत्यंत विश्वासू माणूस होता. परंतु याच बिरबलाचा मृत्यू कसा झाला, याबाबत अनेकांना कल्पना नाही. इतिहासाच्या पानावर असा एक दुर्दैवी दिवस आहे, ज्या दिवशी बिरबलाचा मृत्यू झाला. बिरबलाच्या मृत्यूनंतर अकबर बादशाहा अत्यंत व्यतिथ झाला होता. बिरबलासोबत नेमकं काय झालं होतं? ते जाणून घेऊ या…
कोण होता बिरबल? त्याचे दरबारात काय महत्त्व होते?
बिरबलचे खरे नाव महेश दास असे होते. मुघल सम्राट अकबराच्या नवरत्नांपैकी एक होते. बुद्धीमत्ता, कूटनीती, हजरजबाबीपणा यामुळे बिरबल प्रसिद्ध होता. लोककथा आणि टीव्हीवरील वेगवेगळ्या कार्यक्रमात बिरबल हा विनोदबुद्धीचा होता, एवढेच दाखवले जाते. परंतु बिरबल एक अत्यंत हुशार राजकारणी होते. तसेच अकबराच्या दराबारात त्यांच्यावर मोठी प्रशासकीय जबाबदारी होती. बिरबल हे अकबराच्या खूपच जवळ होते.
बिरबलचा मृत्यू नेमका कसा झाला?
सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात अफगाणिस्तानातील काही भाग हा मुघलांच्या अधिपत्याखाली होता. त्या वेळी स्वात आणि बाजौर या भागात युसफजई कबिल्याचे विद्रोही सक्रीय झाले होते. हे विद्रोही तेथील स्थानिक लोकांना त्रास देत होते. याच विद्रोहींचा बंदोबस्त करण्यासाठी अकबराने सेनापती जैन खान कोका यांना पाठवलं. परंतु पर्वतीय प्रदेशात विद्रोहींचा मुकाबला करणे कठीण झाले होते. म्हणूनच जैन कान कोका याने अतिरिक्त कुमक मागवली होती. त्यानंतर राजा अकबराने बिरबलला सैन्य घेऊन उत्तर पश्चिमेचा भाग सांभाळण्यासाठी पाठवले. बिरबलासोबत 8000 सैनिक होते.
बिरबलाकडे चातुर्य होते. परंतु युद्धकलेत मात्र तो तेवढा निपूण नव्हता. बिरबल आणि त्याची सेना जेवाह मलंदराई या भागात पोहोचली त्यावेळी युसूफजईच्या सैनिकांनी डोंगरावरून हल्ला करायला सुरुवात केली. यातच बिरबलासोबतचे 8000 सैनिक तसेच बिरबलही मारला गेला असे सांगितले जाते. दरम्यान, बिरबलाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर अकबर मात्र खूपच दु:खी झाला होता. पुढच्या काही दिवस ते कोणाशीही बोलत नसत असे म्हटले जाते.
