AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाचा मोठा इशारा, मोठे संकट, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये..

Weather update : राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. दुहेरी संकट राज्यावर आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती राज्यात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे.

घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाचा मोठा इशारा, मोठे संकट, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये..
heat wave alert
| Updated on: Apr 19, 2026 | 7:06 AM
Share

राज्यात उष्णतेने कहर केला. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. पावसाला पोषक वातावरणही आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. अमरावती आणि वर्धा येते उच्चांकी तापमानाची नोंद झाली. 44.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. नागपूर, वाशिम, गडचिरोली येथे 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. आजही उष्णता वाढणार आहे. नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळा. अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यावर दुहेरी संकट बघायला मिळत आहे. कुठे पाऊस तर कुठे उष्णता अशी स्थिती आहे.

उष्णता वाढत असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन केले जात आहे. अतिमहत्वाच्या कामाशिवाय दुपारी घराबाहेर न पडणे अधिक फायदेशीर. यासोबतच उष्णघातापासून दूर राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. बुलढाणा जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली असून तापमान 40 डिग्री पासून 42 डिग्रीवर पोहचले आहे.  मागील महिन्यात तापमान हे 38 डिग्री पर्यंत गेले होते, मात्र एप्रिल महिन्यात तापमानाची तीव्रता वाढली आहे.

खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्षाची स्थापना केली. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून सध्या तापमान 41 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयात उष्मघात कक्ष उभारण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी या कक्षामध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नंदूरबार जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांना वारंवार रेशन दुकानात जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता रेशनकार्डधारकांना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी दिले जाणार आहे. त्यामुळे विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात सुमारे तीन लाखांहून अधिक रेशनकार्डधारकांना या निर्णयाचा फायदा होणार असून, जिल्ह्यात तापमानाच्या पारा 42 अंश सेल्सिअसच्या गेला.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत