AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुहेरी संकट, अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, या जिल्ह्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासनाने थेट..

IMD warning : राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. राज्यावर मोठं संकट आहे. हेच नाही तर भारतीय हवामान विभागाने पुढील काही तासांकरिता अत्यंत मोठा इशारा दिला आहे. उष्णता अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे.

दुहेरी संकट, अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, या जिल्ह्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासनाने थेट..
Heat warning
| Updated on: Apr 18, 2026 | 7:22 AM
Share

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी भयंकर उष्णता अशी स्थिती आहे. सध्याच्या घडीला राज्यावर दुहेरी संकट आहे. 15 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. हेच नाही तर स्थिती खूप जास्त गंभीर आहे. पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. उष्णघाताची रूग्ण सापडत आहे. अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. दुसरीकडे पावसाचाही मोठी इशारा देण्यात आला. आज राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. अमरावती आणि अकोल्यात 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर नागपूर, सोलापूर, मालेगाव, गडचिरोली आणि यवतमाळ येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. कोकण, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळेल.

वाशिम जिल्ह्यात उष्णतेचा पारा प्रचंड वाढला असून मागील आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे.  तापमान तब्बल 43.4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. या वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला असून आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. एरव्ही उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक रसवंतीगृहांचा आधार घेत. मात्र, सध्या उष्णतेची झळ इतकी तीव्र आहे की नागरिक बाहेर पडणंही टाळत आहेत.

प्रशासनाकडून नागरिकांनी या उष्णतेच्या काळात काळजी नक्की काय घ्यावी, याबाबतच्या सूचना जारी केल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये 41 चा आकडा तापमानाने गाठल्याने नागरिक हैराण होत आहे. 18 एप्रिल पर्यंत उष्णतेची लाट असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. जळगावात वाढत्या तापमानाचा आणि उष्णतेचा केळीच्या बागांना देखील मोठा फटका.

आज 18 एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंद क्लासेस यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. उष्णता अधिक तीव्र होणार असल्याने प्रशासनाकडून दक्षता म्हणून निर्णय घेतला. शक्यतो अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराच्या बाहेर दुपारी पडू नका, असेही आवाहन केले जात आहे. जळगावत तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचल्याने केळीच्या बागांना उन्हाचा तडाखा बसत आहे. वाढत्या तापमानामुळे केळीचे पान पिवळी पडत असून पाने जळून जमिनीवर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Follow Us
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक.
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.