AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर संकट! प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी, महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच, तब्बल..

IMD warning : राज्यातील अनेक जिल्हे संकटात आहेत. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. यासोबतच प्रशासनाकडूनही नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन करण्यात आले. उष्मघाताची लक्षणे दिसताच लगेचच रूग्णालयात जावे.

राज्यावर संकट! प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी, महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच, तब्बल..
Heat warning
| Updated on: Apr 17, 2026 | 7:11 AM
Share

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढली आहे. उद्याासून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. जवळपास जिल्ह्यांमध्ये 40 च्या पार तापमान पोहोचले. उष्णता वाढत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. विदर्भ, मराठवाड्यात उष्णता वाढत आहे. सोलापूर, नागपूर, मालेगाव, धाराशिव, वर्धा येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात सूर्य आग ओकताना दिसला. अकोल्यात 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. गोदिंया, गडचिरोली, बुलडाणा, परभणी, जळगाव, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, अमरावती, वर्धा, धुळे, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, नाशिक, सातारा, नांदेड, अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

राज्यात उष्णता प्रचंड वाढत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकतेचा इशारा जारी करण्यात आला. अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे शक्यतो टाळाच. दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळा. अकोला जिल्ह्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला असून तापमानाने 44 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडलाय. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्रता वाढत चालली आहे.

वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला. तापमानाची तीव्रता कायम. दुपारच्या सुमारास उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण. वाशिम जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने 42 अंशांचा टप्पा पार केला आहे. पुढील काही दिवसांत तापमान 44 ते 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होत असून आज तापमान 42 अंशांच्या पुढे गेले आहे.  वाढत्या उष्णतेमुळे नागरिक केवळ महत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडताना दिसत आहेत, तर दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्यासच दुपारी बाहेर पडावे तसेच पाणी, सरबत व शीतपेयांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.