AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील शाळा होणार अनुदानीत; राज्य मंत्रिमंडळात शाळांविषयी झाला महत्वपूर्ण निर्णय…

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सरकार यावर्षी 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार असून कामगार कायद्यातही सुधारणा करणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

राज्यातील शाळा होणार अनुदानीत; राज्य मंत्रिमंडळात शाळांविषयी झाला महत्वपूर्ण निर्णय...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 13, 2022 | 6:16 PM
Share

मुंबईः राज्यातील शाळांसाठी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील शाळांना 1100 कोटींचे अनुदान देणार असल्याचेही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की शाळांच्या तुकड्यांनाही 20 टक्क्यांच्या टप्प्यामध्ये तुकड्यांना अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सरकार यावर्षी 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार असून कामगार कायद्यातही सुधारणा करणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

कामगार कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून कालबाह्य असलेल्या तरतुदी काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील शाळांना 1100 कोटींचे अनुदार देण्याचे जाहीर झाल्यानंतर त्याचा फायदा शाळा आणि तुकड्यांनाही होणार आहे.

त्याचबरोबर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून 63 हजार 338 एवढ्या शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या अनुदानाविषयी माहिती देताना सांगितले की, राज्यातील शाळा व तुकड्यांना 20 टक्क्यांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तर ज्या शाळांना कोणतेही अनुदान नाही त्या शाळांना 20 टक्के अनुदान तर ज्या शाळांना 20 टक्के अनुदान आहे त्या शाळांना आता 40 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सरकारवर आता 1 हजार 160 कोटींचा अतिरिक्त बोजा येणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्माचाऱ्यांना याचा फायदा होणार असून शाळांनाही 20 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याने त्याचा फायदा राज्यातील अनेक शाळांना होणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल