AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : पुलवामासह अनेक हल्ले झाले, तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही, आज का होतेय? शरद पवार यांचा सवाल

Sharad Pawar on Pahalgam Terrorist Attack : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहेलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी प्रतिक्रिया देताना अचूक टायमिंग साधलं. त्यांनी सरकारच्या निर्णयासोबत असल्याचे जाहीर केले. पण त्याचवेळी एका महत्त्वाच्या मुद्दाला हात घातला.

Sharad Pawar : पुलवामासह अनेक हल्ले झाले, तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही, आज का होतेय? शरद पवार यांचा सवाल
शरद पवारांचा अचूक प्रश्नImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Follow us
| Updated on: Apr 25, 2025 | 3:37 PM

जम्मू-काश्मीर गेल्या पाच दशकांपासून दहशतवादाचा सामना करत आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने येथील विकास खुंटवला आहे. पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे. निरपराध 26 पर्यटकांना नाहक जीव गमवावा लागला आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहेलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी प्रतिक्रिया देताना अचूक टायमिंग साधलं. त्यांनी सरकारच्या निर्णयासोबत असल्याचे जाहीर केले. पण त्याचवेळी एका महत्त्वाच्या मुद्दाला हात घातला.

शरद पवारांची थेट प्रतिक्रिया

पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या घातल्या या प्रश्नावर शरद पवार यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, “मला माहीत नाही. यात काय तथ्य आहे. माहीत नाही. जे प्रवासी होते, त्यात त्यांनी स्त्रियांना सोडलेलं दिसतंय. पुरुषांना गोळ्या घातल्या. पुण्यात दोघांचे मृत्यू झाले. त्यातील दोन लोकांच्या घरी मी गेलो होतो. घरी गेल्यावर त्या भगिनी तिथे होत्या. त्या मला सांगत होत्या. आम्हाला कुणालाही हात लावला नाही. आमच्या पुरुषांना गोळ्या घातल्या.” लोकसभेतील नेत्यांना बोलावलं होतं. आमच्या पक्षाच्या सुप्रिया सुळे या लोकसभेच्या नेत्या आहेत. मी राज्यसभेचा आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे गेल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

धर्माची चर्चा आता का होतेय?

पहेलगाम येथील हल्ला ही धर्माविरोधी लढाई वाटते का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार यांनी अचूक टायमिंग साधलं. ते म्हणाले, ” यापूर्वीही अतिरेक्यांनी हल्ले केले. पुलवामात हल्ला केला. या आधी तीन चार ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ला केला. तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही. आज का होतेय. घडलं ते वाईट आहे. आव्हान आहे देशाला. सक्तीने तोंड द्यावं लागेल. पण त्या निमित्ताने धार्मिक अडसर येण्याचं काम करू नये.”

आम्ही सरकारसोबत

यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या दाव्याची पोलखोल केली. पहलगाम हे ठिकाण अधिक सेफ आहे. दोन तीन महिन्यांपूर्वी मी गेलो होतो. सातत्याने आपले लोक जातात. हे घडलं ते पहलगामला घडलं. याचा अर्थ दहशतवादी प्रवृत्तीविरूद्ध आपण यश मिळवलंय असा निष्कर्ष आपण काढत आहोत तर तो थोडा सावध काढला पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असं सांगितलं जात होतं, असा चिमटा त्यांनी काढला. पण ठीक आहे, उदाहरण पाहिलं आपण याचा अर्थ कुठे ना कुठे तरी अजूनही कमतरता आहे. ती कमतरता घालवली पाहिजे. देशावर हल्ला झाला असेल, सरकार गांभीर्याने निर्णय घेत असेल आणि कमतरता आहे असं मान्य करत असेल तर तातडीने ती कमतरता काढली पाहिजे. त्याही कामात आम्हा लोकांचं सरकारला सहकार्य राहील, अशी भूमिका शरद पवार यांनी जाहीर केली.

बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.