जय भवानी शब्दावरुन रान पेटले; उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ललकारले

| Updated on: Apr 21, 2024 | 1:04 PM

Udhav Thackeray Elections Commission : शिवसेना उभी फुटली. उद्धव ठाकरे गटाला धनुष्यबाण सोडून मशाल हाती घ्यावी लागली. आता त्यांच्या नवीन मशाल गीतावर निवडणूक आयोगाची वक्रदृष्ट फिरली आहे. आता उद्धव ठाकरे पण आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट निवडणूक आयोगाविरुद्धच दंड थोपाटले आहेत.

जय भवानी शब्दावरुन रान पेटले; उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ललकारले
उद्धव ठाकरे
Follow us on

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची निशाणी पण गेली. त्यांना धनुष्यबाण सोडून मशाल हाती घ्यावी लागली. आता मशाल गीतावरुन निवडणूक आयोगाने त्यांना कोंडीत पकडले आहे. मशाल गीतातील जय भवानी शब्द आणि इतर काही शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. त्यावर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिले आहे. कारवाई करायची तर करा. पण आम्ही भवानी हा शब्द काढणार नाही. भवानी माता आमची अस्मिता आहे. अस्मितेशी तडजोड नाही, असा दमच त्यांनी भरला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाविरुद्धचा सामना रंगणार हे वेगळं सांगायला नको.

निवडणूक आयोगाचा फतवा आलाय

आम्ही जे गीत दिलं होतं त्या गीतात त्या गाण्याचा जोश वाढतोय. कोरसला जय भवानी आणि जय शिवाजी घोषणा आहे. त्यातील जय भवानी हा शब्द काढा. हा लेखी फतवा आला आहे. आम्ही जय भवानी हा शब्द काढणार नाही. आमच्यावर कारवाई करणार असाल तर त्यांनी आधी मोदी आणि शहा यांच्यावर कारवाई करावी. मग महाराष्ट्राच्या कुलदैवताची अपमान केला असा आरोप आम्ही केला तर त्याला तुमच्यावर उत्तर आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला.

हे सुद्धा वाचा

जय भवानी शब्द काढणार नाही

राज्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्राबद्दलचा आकस ठासून भरला आहे. पण महाराष्ट्रातील कुलदैवतांबाबतचा आकस असेल याची आम्हाला कल्पना नव्हती. तुम्ही कितीही ठरवलं तरी जतना बघून घेईल. ही महाराष्ट्राची घोषणा आहे. आज जय भवानी शब्द काढायला सांगितलं, उद्या जय शिवाजी हा शब्द काढायला सांगाल. आम्ही त्याविरोधात लढत आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी आयोगाला ठणकावले.

हा पक्षपातीपणा का?

तुळजा भवाई हे महाराष्ट्राचं दैवत आहे. कित्येक वर्ष जय भवानी जय शिवाजी ही घोषणा जनतेच्या हृदयात आहे. निवडणूक आयोगाला आम्ही तेव्हा हेही सा्ंगितलं होतं की उद्या भाजपला परमिशन देत असाल तर उद्या आम्ही हर हर महादेव बोललो, जय भवानी जय शिवाजी बोलल्यावर त्याला आक्षेप असता कामा नये, असे ते म्हणाले.

मग मोदी-शाहंवर कारवाई करा

मनोहर जोशींची सर्वोच्च न्यायालयात केस झाली होती. त्यात हिंदू धर्माची व्याख्या वेगळी केली आहे. आम्ही हिंदू धर्माच्या आधारे मत नाही मागितलं. आम्ही हिंदू धर्म सोडला अशी आवई उठवणाऱ्यांनी आणि त्यांच्याकडे चाकर असलेल्या आयोगाने त्यावर उत्तर दिलं पाहिजे. तत्कालीन पंतप्रधान म्हणाले की, बजरंग बली की जय बोलून मतदान करा. अमित शाह म्हणाले की आम्हाला मतं द्या आम्ही तुम्हाला अयोध्येला नेऊ. मग आमच्यावर कारवाई करण्याअगोदर या दोघांवर कारवाई करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.