AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांचा भाजपविरोधात पहिल्यांदाच मोठा नारा; महात्मा गांधींच्या त्या घोषणेशी काय संबंध?

मुंबईमधील शिवाजी पार्कवर झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता सभेमध्ये इंडिया आघाडीमधील दिग्गज नेत्यांनी भाषणे केलीत. शरद पवार यांनी आपल्या भाषणात पहिल्यांदाच भाजपविरोधात नारा दिला.

शरद पवार यांचा भाजपविरोधात पहिल्यांदाच मोठा नारा; महात्मा गांधींच्या त्या घोषणेशी काय संबंध?
| Updated on: Mar 17, 2024 | 10:03 PM
Share

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप झाला. मुंबईमधील शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन पार पाडलं. इंडिया आघाडीमधील पक्षांचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाजपविरोधात पहिल्यांदाच मोठा नारा दिला. शरद पवार यांनी महात्मा गांधींनी इंग्रजांविरोधात दिलेल्या नाऱ्याचा संदर्भ दिला. पवार यांनी नेमका कोणता नारा दिला जाणून घ्या.

काय म्हणाले शरद पवार?

1942 मध्ये महात्मा गांधी यांनी छोडो भारत, छोडो हुकूमतचा नारा दिला होता. आता याच शहरात छोडो भाजप आणि भाजपसे मुक्ती असा नारा देत निर्धार केला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. टीव्हीवर आपण एक खोटी गोष्ट ऐकली आहे. मोदींची गॅरंटी, ही गॅरंटी चालणारी नाही. खोटं आश्वासन देऊ त्यांनी आपल्याला वेगळ्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न केला. पण आजपासून टीव्हीवर ही गॅरंटी दिसणार नाही. कारण निवडणूक आयोगाने ती रोखण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाचे आभार मानतो, असं शरद पवार म्हणाले.

देशाची आज जी अवस्था आहे, त्यात बदल करण्याची गरज आहे. आपण सर्व मिळून हा बदल घडवून आणू शकतो. ज्या लोकांनी देशाला वेगवेगळी आश्वासने देऊन फसवलं. त्यांना दूर करण्यासाठी आपल्याला मतदानातून बाहेर करावं लागलं. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी देशावासियांना अनेक आश्वासने दिले होते. शेतकरी, दलित, महिला, आदिवासी आणि सर्वांना आश्वासने दिली. ती पूर्ण केली नाही. जे लोक आश्वासने देतात पण पूर्ण करत नाही, त्यांना दूर केलं पाहिजे. पुढच्या महिन्यात आपल्याला ती संधी मिळाली असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मास्क आहे. मुखवटा आहे. बॉलिवूडचे अॅक्टर्स आहे त्यांना रोल दिला जातो. आज हे बोलायचं, उद्या ते बोलायचं. सकाळी समुद्राखाली जा, सी प्लेनमधून उडा. 56 इंचाची छाती नाही. खोकला व्यक्ती म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली. इंडिया आघाडीच्या शक्ती प्रदर्शनामध्ये  तेजस्वी यादव, शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, राहुल गांधीसह इतर नेत्यांनी आपल्या भाषणांमधून भाजपवर निशाणा साधला.

Follow Us
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी.
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय.
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट...
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट....
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल.
नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! भागातील सर्व CCTV फुटेज...
नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! भागातील सर्व CCTV फुटेज....
नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडातून... शवविच्छेदन अहवालातून थक्क
नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडातून... शवविच्छेदन अहवालातून थक्क.
फास्टट्रॅक म्हणजे नेमकं काय? सरकारने व्याख्या सांगावी....
फास्टट्रॅक म्हणजे नेमकं काय? सरकारने व्याख्या सांगावी.....
अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....
अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप......