AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भुजबळांचे लाड कशाला, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’, शिंदे गटाच्या दोन आमदारांची मागणी; सरकारमध्ये आलबेल नाही?

मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र सरकारमध्ये सारं काही आलबेल नाही, असंच चित्र सध्या दिसत आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या अध्यादेशावर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलाय. त्यानंतर आता शिवसेनेच्या दोन आमदारांनी भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

'भुजबळांचे लाड कशाला, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा', शिंदे गटाच्या दोन आमदारांची मागणी; सरकारमध्ये आलबेल नाही?
chhagan bhujbal Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 31, 2024 | 3:12 PM
Share

गिरीश गायकवाड, टीव्ही9 प्रतिनिधी, मुंबई | 31 जानेवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयरेबाबतची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे मराठ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण सरकारच्या या निर्णयावर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी हा कायदा कोर्टात टिकणार नाही यासाठी कायदेशीर बाजूंचा अभ्यास करायलाही सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना सगेसोयरेबाबतचा अध्यादेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली. छगन भुजबळ यांच्या या भूमिकेमुळे सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकीकडे सरकार मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करताना दिसत आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका करत आहेत. छगन भुजबळ यांच्या भूमिकेमुळे आता सरकारमध्ये सारं काही आलबेल नाही, असंच चित्र दिसत आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या जोन आमदारांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून थेट हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मागणीवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना त्यांनीदेखील भुजबळांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भूजबळ यांची हकालपट्टी करा. कशाला लाड करता? याला आधी बाहेर काढा, असं आवाहन संजय गायकवाड यांनी केलं आहे. तर संजय शिरसाट यांनीदेखील भुजबळांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे.

संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

“मंत्री छगन भूजबळ जो तिरस्कार करतात ते योग्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भूजबळ यांची हकालपट्टी करा. कशाला लाड करता? याला आधी बाहेर काढा. मंत्रीपदाची शपथ घेताना सरकारच्या विरोधात काम करणार नाही याची शपथ भूजबळ यांनी घेतली आहे. भूजबळ यांच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही सहमत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेतलीय. ज्या मराठ्यांनी हा देश वाचवला त्यांच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नाही. एका मंत्र्याच्या विरोधाने सरकारला फरक पडत नाही, मी खुलेआम सांगतोय. त्यांच्या राजीनाम्याने ना सरकारला फरक पडणार आणि ना एनसीपीला”, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली आहे.

“जो जीआर निघाला तो जरांगे पाटील यांच्या सांगण्यानुसार निघालाय. सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील. 57 लाख नोंदी सापडल्या आहेत. वेगळ्या आरक्षणाची त्यांना गरज नाही. ते ओबीसीच आहेत. त्यांना सर्टिफिकेट मिळायला हवं. सगेसोयरेबाबात अधिसुचना 16 फेब्रुवारीला निघेल. तोपर्यंत जरांगे पाटील यांनी दम धरावा आंदोलन करू नये , सरकार सकारात्मक आहे”, असंदेखील आवाहन संजय गायकवाड यांनी केलं.

संजय शिरसाट काय म्हणाले?

“संजय गायकवाड यांचं वक्तव्य वैयक्तिक असलं तरी, काही लोकांना राजकारण करायचं असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे. सरकारमधील मंत्र्यांना सरकार चुकलंय हे सांगायचं असेल तर मंत्रिमंडळ बैठकीत बोलले पाहिजे. बाहेर येऊन बोलायचे असेल तर मंत्रिमंडळातून बाहेर पडले पाहिजे. आता काही लोक आमचे सरकार आल्यास आम्ही असं केलं असतं तसं केलं असतं म्हणतात. मग पूर्वी तुमचं सरकार होतं ना तेव्हा का नाही केलं? राजकारण करताना कोणत्याही समाजाला वेठीस धरू नका”, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी सुनावलं.

“मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर शंका घेऊ नये. तशी शंका घेतली तर मुख्यमंत्री अडचणीत येतात. मुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आहे ते ती पूर्ण करणार, प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जरांगे यांनी वाट पहावी”, असं आवाहन संजय शिरसाट यांनी केलं.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.