AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 9 तास सवाल-जवाब, ईडीने रवींद्र वायकर यांना काय-काय विचारलं?

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची आज तब्बल 9 तास ईडी चौकशी झाली. ईडी चौकशीनंतर रवींद्र वायकर ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. आपल्यावर राजकीय दबावातून कारवाई केली जात असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

तब्बल 9 तास सवाल-जवाब, ईडीने रवींद्र वायकर यांना काय-काय विचारलं?
| Updated on: Jan 29, 2024 | 9:31 PM
Share

मुंबई | 29 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडीकडून सलग 9 तास चौकशी झाली. या चौकशीनंतर रवींद्र वायकर ईडी कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. राजकीय दबावातून आपल्याविरोधात ही कारवाई केली जात असल्याचा आरोप रवींद्र वायकर यांनी केला. “ते 9 तारखेला माझ्या घरी आले तेव्हा त्यांनी सांगितलं की, मी ज्यावेळी सुप्रीमो अॅक्टिविटी सेंटर बांधलं, त्या अनुषंगाने 2002 पासूनचे आतापर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे सांगितलं आहे. आता तुम्ही सांगा 19 वर्षांचे कागदपत्रे तुम्ही ताबोडतोब देऊ शकता का? हा प्रश्न होता. त्यामुळे मी त्यांच्याकडे वेळ वाढवून मागत होतो. एकतर माझी तब्येत बरी नव्हती हा वेगळा विषय होता”, असं स्पष्टीकरण रवींद्र वायकर यांनी यावेळी दिलं.

“इनकम टॅक्सच्या नियमानुसार सात वर्षांचा तपशील द्यायला हवा. पण त्यांनी 19 वर्षांचा तपशील मागितला त्यामुळे वेळ लागणार होता. पण त्यांनी जो आज वेळ दिला होता त्यानुसार मी आलो. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून माझ्यावर बांधकामाची जी तक्रार केली होती, मी जे क्लब बांधलं होतं त्याला ओसी वगैरे सर्व होतं. जवळपास 19 वर्षे ते चाललं. तेव्हा कोणती तक्रार झाली नव्हती. ते तोडून नवीन डीसीआर आल्यानंतर त्याच्या माध्यमातून दोन वर्ष बांधकामाचं काम झालं. पण राजकीय दबावातून आणि आयुक्तांच्या माध्यमातून ते बांधकाम बंद करण्याची नोटीस दिली”, असं रवींद्र वायकर यांनी सांगितलं.

रवींद्र वायकरांनी हिशोब सांगितला

“आम्ही त्या नोटीसला कोर्टात चॅलेंज दिलं. आम्ही आता सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. सुप्रीम कोर्टात तारीख आहे. पण त्याअगोदर जी तक्रार झाली होती त्यामध्ये त्यांनी जो आरोप केला त्यामध्ये म्हटलंय की, तुम्ही कोट्यवधी कमवले. तक्रारदारांनी दावा केलाय की, आम्ही 500 कोटींचा घोटाळा केला. अरे 32 ते 36 कोटींचा गेल्या 19 वर्षात बिझनेस झाला. त्यावर 20 कोटी खर्च पगार देण्यात झाला. त्यामुळे 11 कोटी आले. यापैकी आम्हाला प्रत्येकी 1 कोटी 22 लाखाचा फायदा झाला. बाकीचे 5 कोटीचे फायदा झाला ते पंजाब-महाराष्ट्र बँकेत आहेत”, असा हिशोर वायकर यांनी सांगितला.

‘हे मी त्यांना पटवून दिलं’

“आम्हाला महिन्याला किती फायदा झाला असेल? याउलट पुनर्बांधकामाला परवानगी मिळाली तेव्हा बेसमेंटमध्ये त्यापेक्षा जास्त खर्च झाला आहे. अशा पद्धतीने एखाद्या वास्तूला परवानगी दिल्यानंतर त्याचं बांधकाम झाल्यानंतर त्याचा जबाबदार कोण? हे मी त्यांना पटवून दिलं आहे”, अशी प्रतिक्रिया वायकर यांनी दिली.

‘कुणाच्या दबावाखाली तुम्ही हे करत आहात?’

“ज्यांनी क्लब घेतले त्यामध्ये लग्न होत नाहीत का, ज्या शाळांमध्ये हॉल आहेत तिथे लग्न होत नाहीत का? मग त्या ठिकाणी वेगळा कायदा आणि रवींद्र वायकरला वेगळा कायदा. हे असं का होतंय? हे चुकीचं होतंय ना, कुणाच्या दबावाखाली तुम्ही हे करत आहात? हे चुकीचं आहे. कसा दबाव चाललाय ते मला माहिती आहे. पण मी कायद्याच्या कक्षात कोणतीही चूक केलेली नाही हेच त्यांना सांगितलं आहे. ते जेव्हा बोलवतील तेव्हा नक्कीच येणार. हे जे चाललेलं आहे राजकीय दबावातून चालू आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात निकाल लागेलच. मी कायद्याच्या दृष्टीने तपासयंत्रणांना सहकार्य करत राहणार आहे”, अशी भूमिका रवींद्र वायकर यांनी मांडली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.