AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार, भुसेंना नोटीस पाठवताना ईडीची शाई संपते का ? संजय राऊत कडाडले

जे भाजपासोबत जात नाहीत त्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर राजकीय सूडातून कारवाई केली जात आहे. भाजपासोबत गेल्यावर कारवाी बंद केली जाते. हे चित्र देशासाठी चांगलं नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली.

अजित पवार, भुसेंना नोटीस पाठवताना ईडीची शाई संपते का ? संजय राऊत कडाडले
sanjay raut
| Updated on: Jan 29, 2024 | 11:38 AM
Share

पुणे | 29 जानेवारी 2024 : 12-13 वर्षांपूर्वीच्या लहान लहान गोष्टी काढायच्या आणि 2-5लाखांसाठी चौकशी करायची. ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड ब्रांच आहे. जे भाजपासोबत जात नाहीत त्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर राजकीय सूडातून कारवाई केली जात आहे. भाजपासोबत गेल्यावर कारवाी बंद केली जाते. हे चित्र देशासाठी चांगलं नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी आहे, त्यासंदर्भात बोलताना राऊत यांनी सरकारवर टीका केली.

किरीट सोमय्या यांच्यावर टीका

हा जो मुलुंडचा एक माणूस आहे, पोपटलाल, त्याने आयएनएस विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंग करून कोट्यवधी रुपये गोळा केले, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, खालच्या कोर्टात त्याला आणि त्याच्या मुलाला जामीन नाकारला. ते भूमीगत झाले. नंतर त्यांनी जामीन मॅनेज केला आणि सरकार आल्यावर त्यांच्यावरील एफआयआर काढून टाकला. मग हा मुलंडचा पोपटलाल कसा मोकळा ? असा सवाल विचारत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडलं.

अजित पवार यांचा ७० हजार घोटाळा, शिखर घोटाळा हे तर पंतप्रधान सांगतात. दादा भुसे, राहुल कुल यांना नोटीस का नाही पाठवली ? त्यांना नोटीस पाठवताना ईडीची शाई संपते का ? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

राजकीय सूडबुद्धीतून कारवाई सुरू

भाजपासोबत गेलात की सगळी चौकशी बंद होते. ही सगळी जी कारवाई आहे ती राजकीय सूडबुद्धीतून सुरू आहे. पण आमच्यासारखी माणसं झुकणार नाहीत. टाका ना तुरुंगात तुम्ही, एकदा टाकून झालं आहे, परत टाका किती दिवस टाकणर, असा सवालही त्यांनी विचारला. फासावर लटकावायचचं असेल तर लटकवा, देशातील हुकूमशाही विरोधात आम्ही लढत आहोत, आम्ही मागे हटणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

राहूल नार्वेकरांवरही केली टीका

ओम बिर्ला यांनी राहूल नार्वेकर यांची राजकीय पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘हा सर्वात मोठा फ्रॉड आहे या देशातला.’ ज्या माणसाने आत्तापर्यंत १० पक्षांतरं केली आहेत, सहज पचवून ढेकर दिली आहे , ज्या व्यक्तीनं शिवसेनेच्या फुटीला मान्यता दिली ( जी घटनेत मान्य नाही) अशा व्यक्तीची राजकीय पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी निवड होत असेल तर तो काय महान माणूस आहे. राहुल नार्वेकर भाजपचा हस्तक म्हणून निर्णय दिला आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला