AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?

भाजपच्या बैठकीत महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं असल्याचा दावा काल करण्यात आला. परंतु हा दावा अमित साटम यांनी फेटाळून लावला.

दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
amit satam news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 25, 2026 | 12:01 PM
Share

मुंबई महापालिकेच्या भाजपच्या नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद झाल्याचा दावा करण्यात येत होता. या बैठकीत महपौर आणि शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यातच भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासमोर वाद झाल्याचा दावा करण्यात येत होता. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. या चर्चेदरम्यान भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. भाजपच्या बैठकीत खडाजंगी झाल्याच्या बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते.

बैठकीत खडाजंगी झाल्याच्या बातम्या बिनबुडाच्या – अमित साटम 

भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अमित साटम म्हणाले, ‘ ज्यांनी बातमी दिली, ती निराधार आहे. बैठकीत माध्यमांना प्रवेश नव्हता. मी बैठकीचा अध्यक्ष होतो. बैठकीचे मुद्दे तुम्हाला सांगितले. याच्या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झाली नाही. कालच्या माध्यमांवरील बातम्या या बिनबुडाच्या बातम्या आहेत. त्याला कोणताही आधार नाही’.

25 वर्षांत जमलं नाही, ते 6 महिन्यात केलं – साटम 

‘तुम्ही दिलेल्या बातमीनुसार काही घडलं नाही. झारीतील शुक्राचार्य…महापौरांचा रोख हा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर होता. त्याची माहिती काढू शकता. त्याचं स्वातंत्र्य आहे. जे खरं आहे, ते सांगत आहे. प्रशासनातील काही अधिकारी असतील. विरोधी पक्षातील काही नगरसेवक असतील. त्यांचं स्टँडिंगमधील अंडरस्टँडिंग बंद झाल्याने अनेकांचा तीळपापड झाला आहे. अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. अनेक जण आमच्या नेत्यांना खासगीमध्ये भेटून आधीसारखं सुरू करा. अशी विनंती करत आहेत. मुंबईकरांना दिलेलं वचन पूर्ण करणार आहोत. किती फेक बातम्या, फेक नॅरेटिव्ह पसरवले तरी पारदर्शकपणे प्रशासन चालवू. कितीही आरोप केले तरी पारदर्शकपणे काम होईल. ही खरेदी संबंधित जेम पोर्टलवर होईल. काही लोकांचा मीटर बंद झाले आहेत. ते पुन्हा सुरू होणार नाहीत. जे 25 वर्षांत कामे झाले नाही, मागील 6 महिन्यात झाले. 1200 कोटी रुपयांचे टेंडर रद्द झालं. जेम पोर्टल आणलं. मुलांसाठी संविधानिक मूल्यांचे शिक्षण दिलं जात आहे. चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत, असेही साटम यांनी सांगितले.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला