AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शिवसेना सोडली त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली”; ठाकरे गटाच्या आमदाराने बंडखोर आमदारांचा इतिहास सांगितला

ज्या कोकणामध्ये विकास कामं मंजूर केली होती त्या विकास कामांना मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला आहे. मात्र हा स्टे मुख्यमंत्र्यांनी उठवला पाहिजे आणि लोकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या पाहिजेत अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शिवसेना सोडली त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली; ठाकरे गटाच्या आमदाराने बंडखोर आमदारांचा इतिहास सांगितला
| Updated on: May 31, 2023 | 3:49 PM
Share

मुंबईः राज्यात सत्तांतर झाल्यापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यानंतर अपात्र आमदारांच्या विषयावरूनही जोरदार गदारोळ माजला होता. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाने शिवसेनेवर जोरदार तोफ डागली आहे. त्यातच आता महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंनी दिल्लीत ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात जोरदार आंदोलन पुकारले आहे. त्यावरूनच आता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावर बोलताना त्यांनी केंद्रावर जोरदार टीका केली आहे.

केंद्र सरकारकडून महिलांवरती अन्याय अत्याचार थांबतील असं कोणतही विधान करण्यात येत नाही. दिल्लीतील कुस्तीपटू बघा महिनाभरापासून उपोषण करतात त्यांना न्याय मिळत नाही असा घणाघात त्यांनी केंद्रावर केला आहे.

त्यातच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्याकडून वारंवार बेताल वक्तव्य केली जात होती, त्यातच ते मित्र पक्षाचे आमदार असल्यामुळे आता शिरसाठ यांच्यावरही विनयभंगाचा गुन्हा दाखल होणार नाही हे आधीपासूनच ठाऊक होतं आणि म्हणूनच आम्ही आवाज उठवत होतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सुषमा अंधारे या ज्या पद्धतीने काम करतात त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची त्यांची वाळू सरकलेली आहे असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे याआधीसुद्धा काही आमदार घेऊन नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती, पण त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली त्यांच्यासोबत जे आमदार गेले. ते इतिहासात जमा झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेले ते देखील इतिहास जमा होतील असा इशाराच त्यांनी त्यांना दिला आहे.

यावेळी वैभव नाईक यांनी सांगितले की, ज्या कोकणामध्ये विकास कामं मंजूर केली होती त्या विकास कामांना मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला आहे. मात्र हा स्टे मुख्यमंत्र्यांनी उठवला पाहिजे आणि लोकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या पाहिजेत अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.