AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शिवसेना सोडली त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली”; ठाकरे गटाच्या आमदाराने बंडखोर आमदारांचा इतिहास सांगितला

ज्या कोकणामध्ये विकास कामं मंजूर केली होती त्या विकास कामांना मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला आहे. मात्र हा स्टे मुख्यमंत्र्यांनी उठवला पाहिजे आणि लोकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या पाहिजेत अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शिवसेना सोडली त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली; ठाकरे गटाच्या आमदाराने बंडखोर आमदारांचा इतिहास सांगितला
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 31, 2023 | 3:49 PM
Share

मुंबईः राज्यात सत्तांतर झाल्यापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यानंतर अपात्र आमदारांच्या विषयावरूनही जोरदार गदारोळ माजला होता. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाने शिवसेनेवर जोरदार तोफ डागली आहे. त्यातच आता महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंनी दिल्लीत ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात जोरदार आंदोलन पुकारले आहे. त्यावरूनच आता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावर बोलताना त्यांनी केंद्रावर जोरदार टीका केली आहे.

केंद्र सरकारकडून महिलांवरती अन्याय अत्याचार थांबतील असं कोणतही विधान करण्यात येत नाही. दिल्लीतील कुस्तीपटू बघा महिनाभरापासून उपोषण करतात त्यांना न्याय मिळत नाही असा घणाघात त्यांनी केंद्रावर केला आहे.

त्यातच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्याकडून वारंवार बेताल वक्तव्य केली जात होती, त्यातच ते मित्र पक्षाचे आमदार असल्यामुळे आता शिरसाठ यांच्यावरही विनयभंगाचा गुन्हा दाखल होणार नाही हे आधीपासूनच ठाऊक होतं आणि म्हणूनच आम्ही आवाज उठवत होतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सुषमा अंधारे या ज्या पद्धतीने काम करतात त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची त्यांची वाळू सरकलेली आहे असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे याआधीसुद्धा काही आमदार घेऊन नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती, पण त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली त्यांच्यासोबत जे आमदार गेले. ते इतिहासात जमा झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेले ते देखील इतिहास जमा होतील असा इशाराच त्यांनी त्यांना दिला आहे.

यावेळी वैभव नाईक यांनी सांगितले की, ज्या कोकणामध्ये विकास कामं मंजूर केली होती त्या विकास कामांना मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला आहे. मात्र हा स्टे मुख्यमंत्र्यांनी उठवला पाहिजे आणि लोकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या पाहिजेत अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Follow Us
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल