AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वा खाली जे सरकार आहे ते मनमोकळेपणाने काम करते; अजितदादांचे मत; अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता

मुंबईः राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) विरोधकांच्या टीकेला जोरदार फटकेबाजी लगावून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कुणावरही अन्याय करणार नाही असे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वा खाली जे सरकार आहे त्यात मनमोकळेपणाने काम करत असून नवीन सदस्यांना बोलण्यासाठी संधी देते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, जनतेची कामं […]

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वा खाली जे सरकार आहे ते मनमोकळेपणाने काम करते; अजितदादांचे मत; अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता
Ajit Pawar budget sessionImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 25, 2022 | 10:36 PM
Share

मुंबईः राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) विरोधकांच्या टीकेला जोरदार फटकेबाजी लगावून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कुणावरही अन्याय करणार नाही असे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वा खाली जे सरकार आहे त्यात मनमोकळेपणाने काम करत असून नवीन सदस्यांना बोलण्यासाठी संधी देते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, जनतेची कामं करण्यासाठी म्हणून मात्र यंदा 9 वाजल्यापासून सभागृह चालू केल आहे. यावेळी विरोधी पक्षांनाही बोलण्यासाठी वेळ दिला आहे. त्यामुळेच यावेळचे अधिवेशन हे अगदी व्यवस्थित आणि सुरळीत पार पडले.राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता झाली त्यावेळी ते बोलत होते.

सरकारच्या योग्य कामामुळे आणि चांगल्या निर्णयामुळेच शक्ती बिलं दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. या बिलाला विरोधकांनीही सहमती दिली आहे.

आमचं कामावर लक्ष

महाविकास आघाडीने कामावर लक्ष केंद्रीत केले असल्यामुळे आणि विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची आहेत म्हणून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवलं होतं की उत्तर द्यायची आहेत. मात्र राज्यपाल यांच्या अभिभाषणावर बोलता आलं नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, 3 मार्च पासून जे जे काही मुख्यमंत्री यांना जाणवलं आहे आणि ज्या घटना विरोधकांकडून होत होत्या, त्या सगळ्या गोष्टींना त्यांनी समर्पक उत्तरं दिली आहेत.

विरोधकांना समर्पक उत्तरं

तसेच यावेळी त्यांनी जाणीवपूर्वक सांगितले की, आम्ही सरकार मध्ये नवीन नाही, मात्र आम्ही जेव्हा विरोधात होतो तेव्हा जे प्रश्न उपस्थित केले होते त्याला आम्ही उत्तरं दिली नाहीत. विरोधी पक्ष नेत्यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते त्यांना आम्ही समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे असे मतही त्यांनी मांडले.

मुख्यमंत्र्यांनी विजेचा प्रश्न तातडीन सोडवला

विजेच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, विजेचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी तातडीने सोडवला आहे. त्यामुळेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सभागृहात तातडीने त्यांनीही काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. नगरविकासची जी बिलं आहेत त्या त्या शहरांना आणि गावांना पैसे द्यायचे आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंतचा अल्टीमेटम

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, 31 मार्चपर्यंतचा अल्टीमेटम परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. त्यामुळे एसटीमधील असलेले सगळे कामगार ही मराठी माणसं आहेत, त्यामुळे माणसं चुकली की, त्यांना पदरात घ्यायचं असतं अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे अजित पवार यांनी बोलताना सांगितले की, आता मात्र माझी विनंती आहे की आता कोणाच्याही सल्ल्याला बळी पडू नका, एसटी तुमची आहे तुम्ही एसटीचे आहात आता तुम्ही कामावर यावे अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

कामावर रुजू झाला नाही तर कारवाई

एसटी कर्मचाऱ्यांना विनंती करण्याबरोबरच निलंबनही मागे घेऊ असे मत मांडले. मात्र आता कामावर रुजू झाला नाही तर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. याबरोबरच त्यांनी एसटीचा खासगीकरणाचा विचार आमचा नाही, महामंडळासाठी आम्ह 1 हजार बसेस सीएनजीवर चालणाऱ्या घेणार आहोत आणि 2 हजार बसेस आम्ही इलेक्ट्रिक घेणारे आहोत असेही त्यांनी सांगितले. तसेच महामंडळाकडे असणाऱ्या जुन्या बसेस खराब झाल्या आहेत त्यामुळे 7 हजार बसेस आपल्याला लागणार असून ग्राहकांना सुरक्षित प्रवास आम्हाला द्यायचा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या 

CET परीक्षांच्या तारखा जाहीर, उदय सामंतांची ट्विटवरुन घोषणा, ऑनलाईन नोंदणीला सुरुवात

राज्यसभेत संजय सिंग प्रकाश जावडेकर The Kashmir Files वरुन आमने सामने, टॅक्स फ्रीच्या मुद्यावर जावडेकरांनी AAP ला घेरलं

कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो 31 मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा: मंत्री अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....