AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कोरोनाची आज दुसरी लाट, उद्या तिसरी येईल, म्हणूनच जीवनशैलीत बदल करा,” मुख्यमंत्र्यांचे आवाहन

आपल्या  जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केले. (corona pandemic uddhav thackeray)

कोरोनाची आज दुसरी लाट, उद्या तिसरी येईल, म्हणूनच जीवनशैलीत बदल करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
UDDHAV THACKERAY CORONA
| Updated on: Apr 09, 2021 | 8:06 PM
Share

मुंबई :  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपल्याला या संकटाला सामोरे जायचे आहे. त्यामुळे  कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक निर्बंध आवश्यकच आहेत. आज कोरोनाची दुसरी लाट आहे. उद्या तिसरी लाट येईल. त्यामुळे आपल्या  जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी  केले. आज त्यांची डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख  मुख्य सचिव सीतराम कुंटे,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (strict rule have to follow have to adapt ourselves to handle Corona pandemic said Uddhav Thackeray)

कामगारांना शक्य असेल तर घरूनच काम द्या

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्गावर विस्तृत भाष्य केले.” संकटाची चिंता नाही. पण या संकटाला सामोरे जातांना सहकार्य करणाऱ्या मित्रांची नक्कीच गरज आहे. कोरोनाचे आव्हान मोठे आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय आणि व्यापार करताना गर्दी होणार नाही याची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे. मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे की  आपल्या सर्वच कामगारांना एकाच शिफ्टमध्ये न बोलवता ज्यांना घरी राहून काम करणे शक्य आहे त्यांना ते करू दिले पाहिजे. ज्यांना कारखान्याच्या आवारात यायचे त्यांच्या शिफ्ट लावल्या पाहिजेत,” असे ते म्हणाले.

लस घेतली तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळा

तसेच कोरोनाची आज दुसरी लाट आहे, उद्या कदाचित तिसरी येईल. आपल्याला यातून बाहेर पडायचे असेल तर कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे. त्यासाठी काही कडक निर्बंधांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी मास्क व्यवस्थित लावणे, हातांची स्वच्छता राखणे, गर्दी टाळणे आणि दो गज की दूरी राखणे आवश्यक आहे. ज्या कारखानदारांना त्यांच्या कारखान्याच्या जागेत काही कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे; त्यांनी कारखान्याच्या आवारातच कामगारांची  राहण्याची व्यवस्था करावी. त्यांचे टेस्टींग, लसीकरण याकडे लक्ष दिले जावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कडक निर्बंध गरजेचे

पुढे बोलताना, राज्यात फेब्रुवारी 2021 पर्यंत परिस्थिती ठीक झाली होती. परंतु कोरोनाचा नवा विषाणू असा आहे जो वेगाने पसरतो आहे.  त्याला थांबवायचे असेल तर काही कडक निर्बंध आवश्यकच आहेत. आजही  75 ते 80 टक्के लोकांना कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यांना त्रासही होत नाही परंतू ते इतरांना बाधित करू शकतात. कोरोनाचा प्रसार करू शकतात. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.  ज्वेलरी पार्कच्या प्रस्तावास राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील तसेच डायमंड असोसिएशनने  स्टॅम्प ड्युटी किंवा इतर ज्या मागण्या मांडल्या त्याचा ही शासन गांभीर्याने ‍विचार करील असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर; वाचा, संपूर्ण नियमावली, काय सुरु, काय बंद?

Pune Weekend lockdown guidelines : पुण्यात वीकेंड लॉकडाऊनचे नियम, मेडिकल-दूध वगळता सर्व बंद

(strict rule have to follow have to adapt ourselves to handle Corona pandemic said Uddhav Thackeray)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.