AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या ‘स्वबळा’ला सुशीलकुमार शिंदे यांचंही बळ; म्हणाले…

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिला आहे. (sushilkumar shinde support nana patole)

काँग्रेसच्या 'स्वबळा'ला सुशीलकुमार शिंदे यांचंही बळ; म्हणाले...
सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस नेते
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 6:29 PM
Share

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिला आहे. आता काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही या नेत्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. स्वबळावर लढल्याने काँग्रेसची ताकद वाढेल आणि कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारेल, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. (sushilkumar shinde support nana patole to contest upcoming election alone)

काँग्रेस राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विविध कार्यक्रम राबवून संकल्प दिन साजरा केला. तसेच काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या दादर येथील टिळक भवनच्या नुतनीकरणानंतरचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याचे वारे जोरदार वाहत असल्याची चिन्हे दिसत आहेत. स्वबळावर निवडणुका लढवण्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा नारा हा संघटनेत नवी उमेद व ताकद उभी करण्याचे काम करणारा आहे. पटोले हे काँग्रेसचा झेंडा घेऊन नव्या जोमाने निघाले आहेत. खऱ्या अर्थाने ते बारा बलुतेदारांचे कैवारी असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा जोमाने उभी राहिल, असा विश्वास व्यक्त करत सुशीलकुमार यांनी स्वबळावर लढण्याचं समर्थन केलं आहे.

खुर्ची सोडणं सोपी गोष्ट नाही

यावेळी त्यांनी नाना पटोले यांचं तोंडभरून कौतुक केलं. पटोले यांनी पक्षाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेऊन अवघ्या तीन चार महिन्यातच वादळ उठवून दिले आहे, याचा अभिमान वाटतो. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा त्याग करून ते पक्षासाठी ही पालखी घेऊन पुढे निघाले आहेत. खुर्ची सोडून पक्षासाठी वाहून घेणे ही साधी गोष्ट नाही, असं शिंदे म्हणाले.

घरवापसीचा कार्यक्रम हाती घ्या

यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही भाषण केलं. मध्यंतरीच्या काळात नाईलाजाने काँग्रेस पक्षातून काही लोकांना बाहेर जावे लागले. त्या सर्वांसाठी घरवापसीचा कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. जनसंपर्काचे अभियान हाती घेऊन आगामी काळात कामाला लागले पाहिजे. राहुल गांधींच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम करण्यासाठी पक्ष संघटना व शासन एकत्र येऊन काम करावे लागणार आहे, यातूनच काँग्रेस पक्षाचा विस्तार होईल, असं चव्हाण म्हणाले.

काँग्रेसला नंबरवन करा

देशाला आज राहुल गांधी यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. खऱ्या अर्थाने आज काँग्रेसचा संकल्प दिन आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाला राज्यात पुन्हा एकदा नंबर एकचा पक्ष करण्यासाठी आपणास काम करावे लागणार आहे, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

काँग्रेसचं राज्यभर आंदोलन

दरम्यान, टिळक भवनमधील कार्यक्रमाआधी संत रोहिदास चौकात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, खाद्यतेलाची दरवाढ तसेच मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. राज्यभर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध करत आंदोलन केले. (sushilkumar shinde support nana patole to contest upcoming election alone)

संबंधित बातम्या:

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वामुळेच आमची तिकिटे कापली; सुनील देशमुखांचा गौप्यस्फोट

केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागणार का? नारायण राणेंचं अधिकृत वक्तव्य पहिल्यांदाच जगासमोर

वैभव नाईक थांबला कुठे, पळाला; सिंधुदुर्गातल्या राड्यावर नारायण राणेंचं वक्तव्य

(sushilkumar shinde support nana patole to contest upcoming election alone)

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
CJP Protest Delhi : जंतर-मंतरवरुन अभिजीत दीपके यांची मोठी घोषणा, ‘आता तुम्ही इथे या’.

CJP Protest Delhi : जंतर-मंतरवरुन अभिजीत दीपके यांची मोठी घोषणा, ‘आता तुम्ही इथे या’

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला.

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला

आम्ही डायर नाही, पण ‘कायर’ बघितला, दिल्लीतील CJP आंदोलनावर मनसेचे संदीप देशपांडे यांची खरमरीत टीका.

आम्ही डायर नाही, पण ‘कायर’ बघितला, दिल्लीतील CJP आंदोलनावर मनसेचे संदीप देशपांडे यांची खरमरीत टीका

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO.

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO

विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे निघाले, सरकारसमोर दुहेरी संकट, रस्त्यांवर बॅरिगेट्स, पोलिस पुन्हा अलर्ट.

विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे निघाले, सरकारसमोर दुहेरी संकट, रस्त्यांवर बॅरिगेट्स, पोलिस पुन्हा अलर्ट

बीसीसीआयने तडकाफडकी घेतला मोठा निर्णय, अचानक बदलले एक नाही तर तब्बल आठ नियम बदलले.

बीसीसीआयने तडकाफडकी घेतला मोठा निर्णय, अचानक बदलले एक नाही तर तब्बल आठ नियम बदलले