AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-बंगळुरु महामार्गावर अपघात, तिघांचा मृत्यू, कारचा चेंदामेंदा

मुंबई-बंगळुरु महामार्गावर आज (7 जून) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुंबई-बंगळुरु महामार्गावर अपघात, तिघांचा मृत्यू, कारचा चेंदामेंदा
| Edited By: | Updated on: Jul 07, 2019 | 9:00 AM
Share

मुंबई : मुंबई-बंगळुरु महामार्गावर आज (7 जून) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही कार मुंबईहून पुण्याकडे जात होती. पराग हेरगावकर, राजेंद्र मांजरे आणि अभिषेक शर्मा अशी अपघातात मृत झालेल्यांची नावं आहेत.

मुंबई-बंगळुरु महामार्गावर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणारी स्विफ्ट कार (MH 12 EM 7944) भरधाव वेगाने जात होती. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला (GJ 31 T2614) स्विफ्ट कारने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघातात कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

धडक एवढी जोरदार होती की तिघांचेही मृतदेह छिन्न विछीन्न अवस्थेत कारमध्ये आढळून आले. या अपघातात जखमी असलेल्या एकाला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र धुके पसरलेले आहेत. अशामध्ये अपघात होण्याची शक्यता असते. आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघातात महामार्गावर झालेले आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांनीही गाड्या हळू चालवण्याचे आवाहन सर्वांना  केले आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.