AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आठवले म्हणतात, राज्य सरकार गलथान, 5 लाख लसी फुकट घालवल्या

महाराष्ट्राला लागेल तेवढ्या कोरोना लसींचा पुरवठा केंद्र सरकार करेल. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष देणार आहे. | covid vaccine Ramdas Athawale

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आठवले म्हणतात, राज्य सरकार गलथान, 5 लाख लसी फुकट घालवल्या
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Apr 09, 2021 | 2:32 PM
Share

मुंबई: राज्य सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्रात 5 लाख लसी वाया गेल्या. महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणासाठी जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. महाराष्ट्रात अद्याप 23 लाख लसींचा साठा शिल्लक आहे. पुढची खेप येईपर्यंत या साठ्याचा योग्यपणे वापर करावा, असे रामदास आठवले यांनी सांगितले. (Union minister Ramdas Athawale take a dig at Mahavikas Aghadi govt)

रामदास आठवले यांनी शुक्रवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा पडू देणार नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन यावेळी डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्याचे आठवले यांनी सांगितले.

ठाकरे सरकार केंद्रावर करत असलेले आरोप चुकीचे: आठवले

महाविकासआघाडी केंद्र सरकारवर लसीच्या तुटवड्यासंदर्भात करत असलेले आरोप चुकीचे आहेत. कोरोना लसीकरणावरुन राज्य सरकारने राजकारण करू नये. त्याऐवजी योग्य नियोजन करून लसीकरण सुलभ करावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. महाराष्ट्राला केंद्र सरकार ने यापूर्वीच 1कोटी 6 लाख कोरोना लसीचा पुरवठा केला आहे.त्यातील 5 लाख लसी महाराष्ट्र सरकारने वाया घालविल्या त्यास जबाबदार कोण? असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राला लागेल तेवढ्या कोरोना लसींचा पुरवठा केंद्र सरकार करेल. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

भाजप नेत्यांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, लोकांचे जीव वाचले पाहिजेत: वडेट्टीवार

पुढच्या दहा दिवसांत महाराष्ट्रात 10 लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे विरोधकांनी यावर राजकारण न करता आम्हाला उपाय सुचवावेत. सध्याच्या घडीला देशाच्या अनेक भागांमध्ये लॉकडाऊन आहे.

गुजरातमध्येही अनेक जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन आहे. मात्र, भाजपचे नेते त्यावर काही बोलत नाहीत. फक्त महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला तर भाजपचे नेते टीका करायला सुरुवात करतात, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे. त्यामुळे विरोधकांनी यावरुन राजकारण करु नये. गेल्या महिन्यात एमपीएससीची परीक्षा रद्द झाली तेव्हा भाजपचे नेते रस्त्यावर उतरले. आतादेखील भाजपकडून व्यापाऱ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावले जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: पुण्यात व्हेंटिलेटर्स बेड संपले, ऑक्सिजन बेडसचाही तुटवडा, आता कोव्हिड सेंटरही ‘हाऊसफुल्ल’

महाराष्ट्राला कोरोना लसीचा मुबलक पुरवठा का नाही?, सोशल मीडियावर #MaharashtraNeedsVaccine हॅशटॅग ट्रेंडमध्ये

‘जेवढे प्रयत्न सरकार पाडण्यासाठी करताय तेवढे राज्याच्या हितासाठी करा’, रोहित पवारांचा फडणवीसांवर पलटवार

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?