विशाळगडचा संपूर्ण इतिहास, आता नेमका काय वाद? जाणून घ्या
राज्यात विशाळगडाच्या पायथ्याला असणाऱ्या गावांमध्ये तोडफोड करण्यात आली. गडापासून 10 ते 12 किलोमीटर असणाऱ्या गावांमध्ये झालेल्या तोडफोडीवरून छत्रपती संभाजीराजे आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर टीका होत आहे. पोलीस बंदोबस्त तैनात असताना इतका जमाव कसा काय आक्रमक झाला? किल्ल्याच्या पायथ्याशी होणारी तोडफोड नियंत्रणामध्ये का आणली गेली नाही? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. या तोडफोडीनंतर संभाजी भिडे आणि छत्रपती संभाजीराजे यांना एमआयएमने टार्गेट केलंय. पण अचानक तोडफोड का झाली? अतिक्रमणाबाबत आधी काही चर्चा झाली होती का? याबाबतची सर्व माहिती जाणून घ्या.

अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महारांजाचा प्रत्येक किल्ला हा आपल्याला प्रेरणा देतो. आपलं आयुष्य खूप कठीण आहे. आयुष्यात खूप संघर्ष आहे. पण हे संघर्षमय आयुष्य जगताना शिवरायांचे विचार, त्यांची प्रत्येक मोहीम, त्यांचं धाडसं, त्यांच्या अडचणी, संकटं आणि त्यांनी जिंकून मिळवलेले किल्ले हे जगण्याची नवी उमेद देतात. या किल्ल्यांसाठी शिवरायांच्या शेकडो मावळ्यांनी एकेकाळी प्राणाची आहुती दिली आहे. स्वराज्य उभं राहवं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातलं लहान मुल, महिला, शेतकरी, कष्टकरी सुखरुप राहावेत यासाठी ही झुंज होती. शिवराय इतके संवेदनशील होते की, मोहिमेसाठी निघालेल्या लष्कराला शेतकऱ्यांच्या पिकांमधून आपले घोडे चालवत नेवू नका, असा आदेश द्यायचे. पण त्यांनी निर्माण केलेल्या या स्वराज्यात काही गोष्टी अनपेक्षित घडत आहेत. लोकं आता याच शिवरायांच्या किल्ल्यांच्या इतिहासाला विसरत चालले आहेत का? शिवरायांचे विचार आणि संवदेशनशील स्वभावाला विसरत आहेत का? असा प्रश्न आता पडतो. ...
