AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोगाची लढाई सुरूच राहणार, उदय सामंत यांनी सांगितलं कारण

निवडणूक आयोगाची लढाई अद्याप संपलेली नाही.

निवडणूक आयोगाची लढाई सुरूच राहणार, उदय सामंत यांनी सांगितलं कारण
उदय सामंत यांचा निशाणा कुणाकडं?Image Credit source: tv 9
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Oct 12, 2022 | 4:06 PM
Share

गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : राज्याचे उद्योग मंत्री, शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटावर टीका केली. उदय सामंत म्हणाले, ठाकरे गटानं कुठं जावं हा त्यांचा प्रश्न आहे. सकाळी नऊ वाजता ते कोर्टात जातात. अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय हा बंधनकारक असेल. समता परिषदेनं मशाल चिन्हावर आक्षेप घेतला आहे. त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतलेलं चालेल का, असा सवाल उदय सामंत यांनी केला.

निवडणूक आयोगाचा निर्णय दोन्ही बाजूला ऐकूण घ्यावं लागेलं. निवडणूक आयोगाची लढाई अद्याप संपलेली नाही. ही लढाई अजून सुरू आहे. या पोटनिवडणुकीनंतर मेरिट निवडणूक आयोगाला दाखविणार आहोत.

अंधेरी पोटनिवडणुकीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. त्यामुळे हे सगळे अधिकार त्यांच्याकडेच आहेत. ऋतुजा लटकेबाबतही तेच निर्णय घेतील, असंही उदय सामंत यांनी सांगितलं. शिवसेना, भाजपचा उमेदवार अंधेरी पोटनिवडणुकात असेल, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात लवकरच फॉस्कानसारखा एक मोठा प्रकल्प येणार आहे. कदाचित त्यापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येईल, यासाठी आमच्या बैठका सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी महत्त्वाची बैठक झालेली आहे. लवकरच याबाबतची माहिती दिली जाईल, असंही सामंत यांनी सांगितलं.

ते म्हणाले, आम्ही केवळ मुंबईपुरते मर्यादित नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या शाखा आता उभ्या राहतील. आम्हाला निशाणी मिळालेली आहे. त्या दिशेने काम सुरू आहे. मुंबईतही ठिकठिकाणी आमच्या शाखा सुरू होत आहेत. मध्यवर्ती कार्यालय ही लवकरच कार्यरत होणार आहे, याचं लवकरच उद्घाटन होईल.

Follow Us
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल: