AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मशाल तिथं संथ गतीने मतदानाचा आरोप, ठाकरेंविरोधात शेलारांची तक्रार

मुंबईत काल अनेक ठिकाणी संथ गतीने मतदान सुरु असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यांनी यावरुन भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोप देखील केले. तर दुसरीकडे आचारसंहितेचा भंग केल्याने आशिष शेलार यांनी ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मशाल तिथं संथ गतीने मतदानाचा आरोप, ठाकरेंविरोधात शेलारांची तक्रार
| Updated on: May 21, 2024 | 9:24 PM
Share

काल मुंबईसह राज्यातल्या शेवटच्या टप्प्याचं मतदान झालं. मात्र मशालवर जिथं मतदान होत होतं, त्याच ठिकाणी संथ गतीनं मतदान झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. त्यावरुन भाजपच्या आशिष शेलारांनी निवडणूक आयोगात ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केलीये. उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या संथ गतीच्या मतदानावरुन भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोप केले. त्यावरुन भाजपच्या आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात आयोगात तक्रार दाखल केली. उद्धव ठाकरेंची वक्तव्यं खोटी आणि दिशाभूल करणारी असून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप शेलारांनी केला आहे.

सोमवारी मुंबईतल्या सर्व 6 लोकसभा मतदारसंघासह, ठाणे आणि कल्याण, पालघर अशा एकूण 13 ठिकाणी मतदान झालं. पण ज्या ठिकाणी शिवसेनेची मशाल किंवा महाविकास आघाडीचा उमेदवारांना मतं पडत होती, त्याच ठिकाणी मुद्दाम मतदान संथ गतीनं केल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे.

मुंबईत 3 ते 4 तास मतदानासाठी लागले ही तर वस्तुस्थिती आहेत. स्वत: मतदारांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया ऑन कॅमेरा सांगितल्या. काही ठिकाणी तर मतदान न करताच वैतागून मतदार घरी परतले.

मतदान केंद्रावरील सोयी सुविधा आणि मतदान संथ गतीनं केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंचाच नाही. तर भाजपचाही आहे. स्वत: भाजपचेच उमेदवार पियूष गोयलही संतापले. आणि फडणवीसांनीही निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार केली. तर आता मुख्यमंत्री शिंदेंनीही मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रातील 5 व्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी घटली त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का ? मतदानावेळी वृद्ध मतदारांना रांगेचा आणि कडक उन्हाचा परिणाम मतदानावर झाला का ? 5 व्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनाने पुरेसी काळजी घेतली नव्हती का ?

मतदानाची टक्केवारी कमी का झाली आणि प्रशासनं कुठं कमी पडले याची चौकशी करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 5 व्या टप्प्यात एकूण 55 टक्के मतदान झालंय. मुंबईत मोठ्या प्रमाणात मतदार भर उन्हात घराबाहेर पडले. तशा रांगाही दिसल्या. पण मतदारांना ताटकळत राहावं लागलं हे सत्ताधारीही सांगत आहेत.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.