AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे प्रचंड संतापले, मतदानाच्या दिवशीच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

"मला असं वाटतंय, मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा करतोय. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय. दफ्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई मतं नोंदवताना केली जात आहे", असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे प्रचंड संतापले, मतदानाच्या दिवशीच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
उद्धव ठाकरे
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 20, 2024 | 6:00 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपला संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर अतिशय गंभीर असे आरोप केले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मतदान केल्याशिवाय घरी न जाण्याचं आवाहन केलं आहे. “आज २० तारीख आहे. आपण अशावेळेला भेटतोय की, महाराष्ट्राच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पुढच्या एक-दीड तासांमध्ये थांबणार आहे. मी सकाळपासून विविध भागांची माहिती घेत आहे. मतदारांमध्ये उत्साह खूप आहे. निवडणूक आयोगाकडून प्रत्येकाला दहा-दहा, बारा-पंधरा मेसेज जात आहेत की, मतदान करा म्हणून. त्याप्रमाणे मतदार उतरलेले दिसत आहेत. खूप गर्दी दिसत आहे. पण निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय, असं स्पष्ट दिसतंय”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.

“मतदारांमध्ये उत्साह आहे. पण निवडणूक आयोगाचे तथाकथिक प्रतिनिधी हे मतदान केंद्रात बसले आहेत, त्यांच्याकडून खूप दिरंगाई केली जात आहे. विशिष्ट वस्त्यांच्या ठिकाणी नावे दोन ते तीनवेळा तपासले जात आहेत. एकतर ज्येष्ठ मतदारांना आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप त्रास झालेला आहे. इतरही मतदारांना त्रास झालाय. यामध्ये महिला सुद्धा आहेत. कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही. पिण्याचं पाणी नाही. तरीदेखील मतदार रांगा लावून उभे आहेत. हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

‘निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय’, ठाकरेंचा गंभीर आरोप

“मला असं वाटतंय, मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा करतोय. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय. दफ्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई मतं नोंदवताना केली जात आहे. मी नागरिकांना आवाहन करतोय, आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका. आपण मतदानकेंद्रांमध्ये जावून उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सोडू नका. तुमचं मतदान केल्याशिवाय सोडू नका. तुमच्या मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.