AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असे दिवटे गेलेले बरे ना…, सोडून गेलेल्यांवर उद्धव ठाकरे बरसले

सर्व सामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता माझ्याकडे काही मागण्यासाठी आला नाही. त्यांच्या पिढ्या न् पिढ्या शिवसेनेसोबत आहे. जे गेले, त्यांना काही ओळख नव्हती, त्यांना शिवसेनेने मोठे केले. त्या लोकांना ज्यांनी मोठे केले ती लोक आजही माझ्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

असे दिवटे गेलेले बरे ना…, सोडून गेलेल्यांवर उद्धव ठाकरे बरसले
उद्धव ठाकरे
| Updated on: Jul 19, 2025 | 8:44 AM
Share

शिवसेनेत बंड झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत येऊन सत्ता स्थापन केली होती. महायुतीची सत्ता आल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाहेर पडत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आमच्याकडून जे गेले, ते काय दिवे लावतात ते तुम्ही पाहत आहात. त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे ना.’

कधी कधी भावनेच्या भरात…

शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाली. त्यात पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, काही वेळा साचलेल्या डबक्याला थोडा आऊटलेट द्यावा लागतो आणि नवीन झरा यावा लागतो. कधी कधी भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी एखादा माणूस अयोग्य असला तरी आपण बाजूला करत नाही. पण जेव्हा तो स्वत:हून जातो त्याची जागा दुसरा घेतो तेव्हा बरं वाटते. चला एक ‘बला’ गेली असे वाटते. आता जे आमच्याकडून गेले ते तिकडे जाऊन काय दिवे लावता आहेत, ते तुम्ही बघतच आहात. त्यामुळे असे दिवटे गेलेले बरे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

सामान्य कार्यकर्ता आपल्यासोबतच

शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता आपल्यासोबत आहे, त्यांनी कधीच काही मागितले नाही, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, सर्व सामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता माझ्याकडे काही मागण्यासाठी आला नाही. त्यांच्या पिढ्या न् पिढ्या शिवसेनेसोबत आहे. जे गेले, त्यांना काही ओळख नव्हती, त्यांना शिवसेनेने मोठे केले. त्या लोकांना ज्यांनी मोठे केले ती लोक आजही माझ्यासोबत आहे. ही माझी शक्ती आहे. तीच त्यांची पोटदुखी आहे. अरे हे अजून संपत कसे नाही, असे ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर प्रहार केला.

शिवसेना कधीही कोणी संपवू शकत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि मूळे खाली गेली आहेत. तुम्ही जमिनीचे शत्रू आहात. म्हणून जमीन तुम्ही तुमच्या शत्रूला दिली. मुंबईसह सर्व जमीन तुमच्या मित्राच्या घशात घातली. आम्ही जमीन दोस्ती करणारे आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी कोणाचाही नावाचा उल्लेख न करता सांगितले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.