AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असे दिवटे गेलेले बरे ना…, सोडून गेलेल्यांवर उद्धव ठाकरे बरसले

सर्व सामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता माझ्याकडे काही मागण्यासाठी आला नाही. त्यांच्या पिढ्या न् पिढ्या शिवसेनेसोबत आहे. जे गेले, त्यांना काही ओळख नव्हती, त्यांना शिवसेनेने मोठे केले. त्या लोकांना ज्यांनी मोठे केले ती लोक आजही माझ्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

असे दिवटे गेलेले बरे ना…, सोडून गेलेल्यांवर उद्धव ठाकरे बरसले
उद्धव ठाकरे
| Updated on: Jul 19, 2025 | 8:44 AM
Share

शिवसेनेत बंड झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत येऊन सत्ता स्थापन केली होती. महायुतीची सत्ता आल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाहेर पडत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आमच्याकडून जे गेले, ते काय दिवे लावतात ते तुम्ही पाहत आहात. त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे ना.’

कधी कधी भावनेच्या भरात…

शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाली. त्यात पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, काही वेळा साचलेल्या डबक्याला थोडा आऊटलेट द्यावा लागतो आणि नवीन झरा यावा लागतो. कधी कधी भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी एखादा माणूस अयोग्य असला तरी आपण बाजूला करत नाही. पण जेव्हा तो स्वत:हून जातो त्याची जागा दुसरा घेतो तेव्हा बरं वाटते. चला एक ‘बला’ गेली असे वाटते. आता जे आमच्याकडून गेले ते तिकडे जाऊन काय दिवे लावता आहेत, ते तुम्ही बघतच आहात. त्यामुळे असे दिवटे गेलेले बरे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

सामान्य कार्यकर्ता आपल्यासोबतच

शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता आपल्यासोबत आहे, त्यांनी कधीच काही मागितले नाही, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, सर्व सामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता माझ्याकडे काही मागण्यासाठी आला नाही. त्यांच्या पिढ्या न् पिढ्या शिवसेनेसोबत आहे. जे गेले, त्यांना काही ओळख नव्हती, त्यांना शिवसेनेने मोठे केले. त्या लोकांना ज्यांनी मोठे केले ती लोक आजही माझ्यासोबत आहे. ही माझी शक्ती आहे. तीच त्यांची पोटदुखी आहे. अरे हे अजून संपत कसे नाही, असे ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर प्रहार केला.

शिवसेना कधीही कोणी संपवू शकत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि मूळे खाली गेली आहेत. तुम्ही जमिनीचे शत्रू आहात. म्हणून जमीन तुम्ही तुमच्या शत्रूला दिली. मुंबईसह सर्व जमीन तुमच्या मित्राच्या घशात घातली. आम्ही जमीन दोस्ती करणारे आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी कोणाचाही नावाचा उल्लेख न करता सांगितले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.