AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असे दिवटे गेलेले बरे ना…, सोडून गेलेल्यांवर उद्धव ठाकरे बरसले

सर्व सामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता माझ्याकडे काही मागण्यासाठी आला नाही. त्यांच्या पिढ्या न् पिढ्या शिवसेनेसोबत आहे. जे गेले, त्यांना काही ओळख नव्हती, त्यांना शिवसेनेने मोठे केले. त्या लोकांना ज्यांनी मोठे केले ती लोक आजही माझ्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

असे दिवटे गेलेले बरे ना…, सोडून गेलेल्यांवर उद्धव ठाकरे बरसले
उद्धव ठाकरे
| Updated on: Jul 19, 2025 | 8:44 AM
Share

शिवसेनेत बंड झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत येऊन सत्ता स्थापन केली होती. महायुतीची सत्ता आल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाहेर पडत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आमच्याकडून जे गेले, ते काय दिवे लावतात ते तुम्ही पाहत आहात. त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे ना.’

कधी कधी भावनेच्या भरात…

शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाली. त्यात पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, काही वेळा साचलेल्या डबक्याला थोडा आऊटलेट द्यावा लागतो आणि नवीन झरा यावा लागतो. कधी कधी भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी एखादा माणूस अयोग्य असला तरी आपण बाजूला करत नाही. पण जेव्हा तो स्वत:हून जातो त्याची जागा दुसरा घेतो तेव्हा बरं वाटते. चला एक ‘बला’ गेली असे वाटते. आता जे आमच्याकडून गेले ते तिकडे जाऊन काय दिवे लावता आहेत, ते तुम्ही बघतच आहात. त्यामुळे असे दिवटे गेलेले बरे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

सामान्य कार्यकर्ता आपल्यासोबतच

शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता आपल्यासोबत आहे, त्यांनी कधीच काही मागितले नाही, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, सर्व सामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता माझ्याकडे काही मागण्यासाठी आला नाही. त्यांच्या पिढ्या न् पिढ्या शिवसेनेसोबत आहे. जे गेले, त्यांना काही ओळख नव्हती, त्यांना शिवसेनेने मोठे केले. त्या लोकांना ज्यांनी मोठे केले ती लोक आजही माझ्यासोबत आहे. ही माझी शक्ती आहे. तीच त्यांची पोटदुखी आहे. अरे हे अजून संपत कसे नाही, असे ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर प्रहार केला.

शिवसेना कधीही कोणी संपवू शकत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि मूळे खाली गेली आहेत. तुम्ही जमिनीचे शत्रू आहात. म्हणून जमीन तुम्ही तुमच्या शत्रूला दिली. मुंबईसह सर्व जमीन तुमच्या मित्राच्या घशात घातली. आम्ही जमीन दोस्ती करणारे आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी कोणाचाही नावाचा उल्लेख न करता सांगितले.

Follow Us
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.