.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असे दिवटे गेलेले बरे ना…, सोडून गेलेल्यांवर उद्धव ठाकरे बरसले

सर्व सामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता माझ्याकडे काही मागण्यासाठी आला नाही. त्यांच्या पिढ्या न् पिढ्या शिवसेनेसोबत आहे. जे गेले, त्यांना काही ओळख नव्हती, त्यांना शिवसेनेने मोठे केले. त्या लोकांना ज्यांनी मोठे केले ती लोक आजही माझ्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

असे दिवटे गेलेले बरे ना…, सोडून गेलेल्यांवर उद्धव ठाकरे बरसले
उद्धव ठाकरे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 19, 2025 | 8:44 AM
Share

शिवसेनेत बंड झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत येऊन सत्ता स्थापन केली होती. महायुतीची सत्ता आल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाहेर पडत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आमच्याकडून जे गेले, ते काय दिवे लावतात ते तुम्ही पाहत आहात. त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे ना.’

कधी कधी भावनेच्या भरात…

शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाली. त्यात पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, काही वेळा साचलेल्या डबक्याला थोडा आऊटलेट द्यावा लागतो आणि नवीन झरा यावा लागतो. कधी कधी भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी एखादा माणूस अयोग्य असला तरी आपण बाजूला करत नाही. पण जेव्हा तो स्वत:हून जातो त्याची जागा दुसरा घेतो तेव्हा बरं वाटते. चला एक ‘बला’ गेली असे वाटते. आता जे आमच्याकडून गेले ते तिकडे जाऊन काय दिवे लावता आहेत, ते तुम्ही बघतच आहात. त्यामुळे असे दिवटे गेलेले बरे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

सामान्य कार्यकर्ता आपल्यासोबतच

शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता आपल्यासोबत आहे, त्यांनी कधीच काही मागितले नाही, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, सर्व सामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता माझ्याकडे काही मागण्यासाठी आला नाही. त्यांच्या पिढ्या न् पिढ्या शिवसेनेसोबत आहे. जे गेले, त्यांना काही ओळख नव्हती, त्यांना शिवसेनेने मोठे केले. त्या लोकांना ज्यांनी मोठे केले ती लोक आजही माझ्यासोबत आहे. ही माझी शक्ती आहे. तीच त्यांची पोटदुखी आहे. अरे हे अजून संपत कसे नाही, असे ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर प्रहार केला.

शिवसेना कधीही कोणी संपवू शकत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि मूळे खाली गेली आहेत. तुम्ही जमिनीचे शत्रू आहात. म्हणून जमीन तुम्ही तुमच्या शत्रूला दिली. मुंबईसह सर्व जमीन तुमच्या मित्राच्या घशात घातली. आम्ही जमीन दोस्ती करणारे आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी कोणाचाही नावाचा उल्लेख न करता सांगितले.

Follow Us
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया