AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी समुद्राच्या तळाशी जाऊ शकतात, पण मणिपूरला जात नाही; उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

मी लोकांमध्ये जातो. ग्रामीण भागात माझ्यासभेत शेतकरीच असतात. महाविकास आघाडीने जी कर्जमुक्ती केली ती मिळाली की नाही हे मी त्यांना विचारतो. त्यांना जाहीरपणे विचारतो. चॅनल समोर विचारतो. हे घटनाबाह्य सरकार आलं. त्यांची मदत पोहोचलेलीच नाही. कर्जमाफी जाऊ द्या. कर्जाचा डोंगरच आहे. सरकारचा नाकर्तेपणा सांगायला गेलो तर रात्र जाईल, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदी समुद्राच्या तळाशी जाऊ शकतात, पण मणिपूरला जात नाही; उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 03, 2024 | 7:19 PM
Share

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 3 मार्च 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजूनही मणिपूरला गेले नाहीत. लक्षद्वीपला जाऊन ते समुद्रात डुबकी घेतात. द्वारकेत खोल समुद्रात गेले. मोदी समुद्राच्या तळाशी जाऊ शकतात, पण मणिपूरला जाऊ शकत नाहीत, असा जोरदार हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चढवला आहे. मोदी सरकारचा कारभार नाहीये, तो फक्त भार आहे. केवळ रामनामाचा जप करू नका. रामराज्य आणा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

आमदार कपिल पाटील यांनी नव्या पक्षाची स्थापना केली. या निमित्ताने धारावीत एका सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. एकच प्रोडक्ट कितीवेळा लॉन्च करणार? किती वेळा घासलं तरी त्यातून काय बाहेर पडणार? मोदींशिवाय भाजपकडे कोण पर्याय आहे? आम्ही मोदींविरोधात एकत्र आलो नाही. आम्ही हुकूमशाही विरोधात आहोत. हुकूमशाहीला एकच पर्याय म्हणजे लोकशाही. आम्ही देशभक्त म्हणून एकत्र आलो आहोत. निवडणुकीपुरती जातपात बाजूला ठेवा. देशाला वाचवा. देश टिकला तर आपण धर्म टिकवू शकतो. देशाला वाचवणं हाच आपला धर्म आहे. डोळ्यासमोर देश ठेवा, असं माझे आजोबा सांगायचे. आशीर्वाद द्यायला देव पाहिजे. पण हे देव डोळ्यासमोर ठेवताय आणि देश कुठे आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

थडगं बांधल्याशिवाय राहणार नाही

मी लढाईला मैदानात उतरलो आहे. तुम्ही सर्व सोबत आहात. ही लढाई एकट्याची नाही. मला पंतप्रधान व्हायचंय म्हणून नाही. ही भावी पिढ्यांची लढाई आहे. तुमच्या पिढ्या देशात राहणार आहेत. त्या लोकशाहीने राहणार की हुकूमशाहीने राहणार आहे हे ठरवणारी ही लढाई आहे. हुकूमशाहीचं थडगं शिवरायांचा महाराष्ट्र बांधल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

ईव्हीएम विरोधात आक्रोश

रोजगार कुठे आहे? जिथे जातो तिथे असंतोष आहे. शेतकरी, कामगार आणि विद्यार्थी आक्रोश करत आहेत. सर्वांच्या मनात ईव्हीएमची काळजी वाटत आहे. यावेळी त्यांनी ईव्हीएम घोटाळा केला तर असंतोषाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. ईव्हीएम घोटाळा करून बघाच. देशभर आक्रोश आहे, असं ते म्हणाले.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.