AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेंग्विनमुळे राणीच्या बागेचं उत्पन्न पाच पटीने वाढलं!

पेंग्विन आणण्याआधी राणीच्या बागेत प्रतिव्यक्ती केवळ 2 ते 5 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र त्यानंतर 1 ऑगस्ट 2017 पासून हे शुल्क दोन प्रौढांसह दोन मुलांना 100 रुपये करण्यात आले.

पेंग्विनमुळे राणीच्या बागेचं उत्पन्न पाच पटीने वाढलं!
| Edited By: | Updated on: Jun 09, 2019 | 12:51 PM
Share

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाला पेंग्विनने श्रीमंत केलं आहे. पेंग्निवन आणल्यापासून उद्यानाच्या उत्पन्नात प्रंचड वाढल झाल्याचे चित्र आहे. पेंग्विन आणण्यासाठी उद्यानाचे वार्षिक उत्पन्न केवळ 73 लाख रुपये होते. मात्र, पेंग्विन आणल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढली आणि आता वर्षिक उत्पन्न पाचपट झाली आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचं वर्षिक उत्पन्न आता पाच कोटींवर पोहोचलं आहे.

गेल्या काही दिवसात उद्यानाचा बागेचा कायापालट करण्यात आला. नवीन पक्षी, प्राणी उद्यानात आणले जात आहेत. त्यामुळे मुंबई-महाराष्ट्रासह देशविदेशातील पर्यटकही राणीच्या बागेकडे आकर्षित होते आहेत. मुंबईबाहेरील कुणी मुंबईत आल्यानंतर आवर्जून राणीच्या बागेला भेट देत आहेत. पर्यटकांची संख्या वाढल्याने, पर्यायाने राणीच्या बागेच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे.

2014 च्या मार्च महिन्यात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेंग्विन कक्ष पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. पेंग्विन मुंबईकरांसह महाराष्ट्रातील इतर पर्यटकांसाठी तसं नवीन असल्याने, पर्यटकांचा अर्थात ओघ वाढला.

पेंग्विन आणण्याआधी राणीच्या बागेत प्रतिव्यक्ती केवळ 2 ते 5 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र त्यानंतर 1 ऑगस्ट 2017 पासून हे शुल्क दोन प्रौढांसह दोन मुलांना 100 रुपये करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना पेंग्विनची सफारी मोफत करण्यात आली.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील प्रवेशाची शुल्कवाढ करण्यात आल्याने, नाहक गर्दी सुद्धा कमी झाली. आता शुल्क वाढवल्याने खऱ्या अर्थाने पेंग्विन पाहायला किंवा उद्यानात फेरफटका मारायला येणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे वार्षित 40-50 लाखांवरील उत्पन्न आता थेट चार-पाच कोटींवर पोहोचले आहे.

दरम्यान, ज्यावेळी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेंग्विन आणण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता, त्यावेळी अनेकांकडून टीका झाली होती. मुंबईच्या वातावरणात पेंग्विन जगतील का, इथपासून, ते त्यांचा सांभाळ करण्यासाठी लागणारा खर्च महापालिकेला झेपणार आहे का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, आता स्थिती अशीय की, पेंग्विनमुळे उद्यानाचे उत्पन्न पाचपट वाढले आहे.

Follow Us
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी
रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल
अहिल्यानगर: रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल, सात आरोपींना जन्मठेप