AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदिवलीत साठलेल्या गटारीच्या पाण्याच भाजी विक्री, नागरिकांचे प्रचंड हाल

कांदिवलीतील वार्ड क्र 21 मधील लालजी पाडा, भाजी मार्केटमध्ये चक्क साठलेल्या गटारीच्या पाण्यात भाजीपाला विक्रीची नामुष्की ओढावलीय.

कांदिवलीत साठलेल्या गटारीच्या पाण्याच भाजी विक्री, नागरिकांचे प्रचंड हाल
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 12, 2021 | 3:42 AM
Share

मुंबई : पावसाळा आला की मुंबई आणि परिसरातील कुचकामी सांडपाणी व्यवस्था नागरिकांच्या हालअपेष्टांचं कारण ठरते. कांदिवलीतही हेच चित्र दिसलंय. कांदिवलीतील वार्ड क्र 21 मधील लालजी पाडा, भाजी मार्केटमध्ये चक्क साठलेल्या गटारीच्या पाण्यात भाजीपाला विक्रीची नामुष्की ओढावलीय. इतकंच नाही तर नाईलाज असल्यानं नागरिकांनाही याच पाण्याच उभं राहून भाजीपाला खरेदी करावं लागत आहे. एकीकडे कोरोना संसर्गाचं संकट असताना दुसरीकडे या दुषित पाण्यात भाजीपाला खरेदी करावा लागल्यानं नागरिकांमधून चांगलाच संताप व्यक्त केला जातोय (Vegetable market in drainage water in Kandivali after rain).

विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका वारंवार पावसाच्या साठलेल्या दुषित पाण्यातून चालल्याने लेक्टोसारखे आजार होऊ शकतात असा इशारा देतेय. मात्र, नागरिकांना या पाण्यातूनच प्रवास करावा लागत असल्यानं त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय.

दरवर्षीचीच परिस्थिती, नागरिकांच्या तक्रारींनंतरही उपाययोजना नाहीच

कांदिवलीच्या या भागात दरवर्षी एक तास पाऊस झाला तरी गुडघ्यापर्यंत पाणी साचतं. याच दुर्गंधीयुक्त गटाराचं सांडपाणी मिसळलेल्या पावसाच्या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतो. इतकंच नाही तर दैनंदिन भाजीपाला विक्री आणि खरेदी देखील याच धोकादायक पाण्यात करावी लागते. अशाप्रकारे भाजीपाला खरेदी करावा लागत असल्याने नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर संतापही व्यक्त करतात. मात्र, याचा प्रशासनावर किंवा संबंधित लोक प्रतिनिधींवर काहीही परिणाम होत नाही.

या भागात प्रतिभा गिरकर या नगरसेविका आहेत, तर योगेश सागर हे आमदार आहेत. हा भाग आर/दक्षिण बीएमसी कांदीवलीत येतो. एकूणच जगभरात संसर्गजन्य आजाराने आरोग्यविषयक आणीबाणीची स्थिती तयार केलेली असताना अजूनही जर यावर लक्ष दिलं जात नसेल तर प्रशासन कधी जागं होणार असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.

हेही वाचा :

समुद्रात भरती, वर मुसळधार पाऊस, बीएमसीच्या 6 केंद्रांच्या सलग 8 तास मेहनतीनं पूरस्थिती टाळण्यात यश

‘वरातीमागून घोडे नाचवणं बंद करा, मुंबईकरांची चेष्टा थांबवा’, दरेकरांचा मुंबई महापालिकेवर हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र

Mumbai Rains : मुंबईतील रस्ते जलमय, रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक कोलमडली

व्हिडीओ पाहा :

Vegetable market in drainage water in Kandivali after rain

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं