AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! आम्ही महापालिका निवडणुकांना तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान

आमदारांच्या पात्र-अपात्रतेवरही त्यांनी भाष्य केलं. कोर्ट ठरवतं अपात्रतेचा निर्णय द्यावा की नाही. काही लोक फुकटचे सल्ले देतात. ते देऊ द्या. आपल्या मनावर नसतं. न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे.

सर्वात मोठी बातमी! आम्ही महापालिका निवडणुकांना तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 13, 2023 | 1:51 PM
Share

मुंबई: राज्य सरकार कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने शिंदे-फडणवीस सरकारकडून महापालिकेच्या निवडणुका टाळल्या जात आहेत, असा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. विरोधकांच्या या आरोपाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. निवडणुकीची केस कोर्टात पेंडिंग आहे. आमच्या हातात काहीच नाही. पण आम्ही महापालिका निवडणुकांसाठी कधीही तयार आहोत. आम्ही निवडणुका टाळत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

टीव्ही 9 मराठीने महाराष्ट्राचा महासंकल्प हा कार्यक्रम आयोजित केला आहे. दादरच्या वीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम सुरू आहे. यावेळी टीव्ही9चे संपादक उमेश कुमावत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली.

काही लोक तर सर्वोच्च न्यायालयाला सल्ला देत आहेत. आधी हायकोर्टाला देतच होते. खरं तर निवडणुकांचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. कधीही निवडणुका घेण्यासाठी आम्ही तर तयार आहोत. हे चारपाच महिन्यात एवढं करू शकतात. यांना संधी दिली तर काय करू शकतील, हे लोकांना कळून चुकलं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

निवडणुका डोळ्यासमोर नाही

मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. ते तसंच ठेवायचं का? खड्डे तसेच ठेवले तर तुम्हीच म्हणाल हा मुख्यमंत्री होऊनपण काहीच करू शकला नाही. हा फेल झाला. त्यामुळेच आम्ही सत्तेत येताच मुंबईला खड्ड्यांपासून मुक्ती देण्याचा निर्णय घेतला. आम्ही ही चूक केली का? सत्तेत आल्याबरोबर मुंबईचं काय काय करता येईल याचा आम्ही आढावा घेतला.

आम्ही सत्तेत आलो तेव्हा निवडणुका होत्या का? नव्हत्या. आम्ही डोळ्यासमोर निवडणुका ठेवत नाही. लोकं ठरवतात कोण कामाचं आणि कोण बिनकामाचा. पण आम्ही काम करत राहणार, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मेरीटवर निर्णय व्हावा

यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावरही भाष्य केलं. उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्हाला भीती वगैरे काही नाही. आपलं सरकार कायद्याद्वारे स्थापित झालं आहे. या देशाला घटना आहे. नियम आहे. बहुमताला महत्त्व आहे.

आमच्याकडे 50 आमदार आणि 13 खासदार आहेत. त्यांची मतांची टक्केवारी ही 13 टक्क्यांपेक्षा जास्त होते. आमचं सरकार मेरीटवर आणि नियमाने तयार झालेलं सरकार आहे. कोर्ट पुरावे आणि वस्तुस्थिती बघतं. आमच्याकडे मेजॉरिटी आहे. त्यामुळे मेरिटवर निर्णय व्हावा ही अपेक्षा आहे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आम्हाला टेन्शन नाही

कोर्टात आमचीच केस मजबूत आहे, असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आम्हाला टेन्शन नाही. ज्यांना चिंता तेच सांगतात मजबूत आहे. मजबूत आहे. मी कधीच कोर्टाच्या प्रश्नावर कधीच उत्तरदेत नाही. शेवटी तो कोर्टाचा निर्णय आहे. त्यांनी मेरीट पाहावं एवढीच अपेक्षा आहे. आम्हाला कुणाला सल्ला द्यायचा नाही, असंही ते म्हणाले.

न्याय व्यवस्था सर्वोच्च

आमदारांच्या पात्र-अपात्रतेवरही त्यांनी भाष्य केलं. कोर्ट ठरवतं अपात्रतेचा निर्णय द्यावा की नाही. काही लोक फुकटचे सल्ले देतात. ते देऊ द्या. आपल्या मनावर नसतं. न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असंही ते म्हणाले.

म्हणून निर्णय घेतला

मी मुख्यमंत्री होईल का तेही माहीत नव्हतं. आमचं भवितव्य धोक्यात आलं असं आमदारांनी सांगितलं. सोबत असलेले पक्षाचे लोकं येतात, आमचाच आमदार होणार, आमचाच मुख्यमंत्री होणार असं सांगतात, असं मला आमदारांनी सांगितलं. आम्ही खडड्यात चाललो, असंही आमदार म्हणाले. म्हणून आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती त्यांनी दिली.

Follow Us
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!