AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar: मोदी सरकारच्या कथनी आणि करणीत फरक, बिल्किस बानो प्रकरणात दोषींच्या सुटकेवर काय म्हणाले शरद पवार?

पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट रोजी भाषण दिलं. मी त्यांचं भाषण बारकाईने ऐकलं. त्या भाषणात त्यांनी स्त्रियांच्या सन्मानावर जोर दिला. पण त्यांच्याच गुजरातमधील सरकारने अत्यंत घाणेरडं कृत्य करणाऱ्या आऱोपींना सोडून दिलं. यात लाल किल्ल्यातील भाषणात स्त्रियांची सन्मानाची जी भूमिका मांडली. तिची प्रचिती गुजरातमधून एका निर्णयातून समोर आली नाही. ही चिंताजनक आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या सरकारमधून पाहायला मिळत आहेत. अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

Sharad Pawar: मोदी सरकारच्या कथनी आणि करणीत फरक, बिल्किस बानो प्रकरणात दोषींच्या सुटकेवर काय म्हणाले शरद पवार?
पाचवा एक्का आणणार कुठून, भाजपाचा सवाल
| Edited By: | Updated on: Aug 29, 2022 | 4:30 PM
Share

ठाणे – लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)हे स्त्रियांच्या सन्मानाची जी भूमिका मांडतात, ती भूमिका प्रत्यक्षात बिल्किन बानो (Bilkis Bano)प्रकरणातील दोषींची सुटका करताना दिसली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar)यांनी केली आहे. बिल्किस बानो प्रकरणात सेशन कोर्ट, हाय कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना जन्मठेप दिली. ही ११ किंवा १२ वर्षाची जन्मठेप दिली नव्हती. ती आजन्म जन्मठेपेची शिक्षा दिली. गुजरातमधील भाजपच्या सरकारने या आरोपींना मुक्त केलं. त्या आरोपींचा सत्कारही केला.

पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट रोजी भाषण दिलं. मी त्यांचं भाषण बारकाईने ऐकलं. त्या भाषणात त्यांनी स्त्रियांच्या सन्मानावर जोर दिला. पण त्यांच्याच गुजरातमधील सरकारने अत्यंत घाणेरडं कृत्य करणाऱ्या आऱोपींना सोडून दिलं. यात लाल किल्ल्यातील भाषणात स्त्रियांची सन्मानाची जी भूमिका मांडली. तिची प्रचिती गुजरातमधून एका निर्णयातून समोर आली नाही. ही चिंताजनक आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या सरकारमधून पाहायला मिळत आहेत. अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

मोदी सरकारकडून ईडीच्या गैरवापराचा पवारांचा आरोप

राजकीय नेतृत्वाच्या मागे काही ना काही तरी कारणातून ईडी कशी लावता येईल, सीबीआय लावता येईल का हे प्रकार सुरू आहेत. अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. गुजरातमध्ये या तक्रारी आहेत. झारखंडमध्ये या तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी केंद्रात ज्यांची सत्ता आहे, ते लोक त्यांची ज्या राज्यात सत्ता नाही, तिथलं सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकात आज भाजपचं सरकार आहे. पूर्वी हे सरकार नव्हतं. आधीच्या सरकारमधील काही लोक फोडले गेले. त्यांच्या मदतीने सरकार बनवलं. महाराष्ट्रात शिवसेनेतील एक वर्ग बाजूला केला आणि सरकार घालवलं. मध्यप्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वात सरकार होतं. पण ते फोडून भाजपने सरकार स्थापन केलं आहे. सत्ता लोकांनी दिली नाही तर लोकांनी दिलेल्या सदस्यांना फोडून त्यांना बाजूला करून ही सत्ता हातात घ्यायची हे काम भापजने केलं आहे.

माणसं फोडून सरकार करणे हे देशासमोर आव्हान

देशात राज्य सरकारात त्यांना संधी मिळेल याचा विश्वास त्यांना नाही. केरळमध्ये, आंध्रात, तेलंगणात बिगर भाजपा सरकार आहे. झारखंडमध्ये, पश्चिम बंगालमध्ये बिगर भाजप सरकार आहे. हे बघितलं तर मोजक्याच राज्यात भाजपचं सरकार होतं. इतर राज्यात सरकार नाही. त्यामुळे लोकांचं मत काय होतं हे दिसून येतं. सत्ता येत नसेल तर माणसं फोडणं, ईडीचं वापर करणं हे चित्रं देशात दिसत आहे. हे देशासमोर आव्हान आहे. बिगर भाजपा पक्षांशी संवाद साधून आम्ही सरकार विरोधात जनमत तयार करणार आहोत. अजून चर्चा केलेली नाही. यात लक्ष घालण्याची गरज आहे. कारण संसदीय लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. असे शरद पवार म्हणाले.

दुसऱ्या पक्षातीन नेत्यांना त्रास देतायेत-पवार

राजकीय नेत्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. राज्यात अनिल देशमुख यांच्यावर काय झालं सर्वांना माहीत आहे. त्यांना अटक केली. रेड मारली. किती रेड कराव्यात. त्यांच्या घरावर ईडीच्या 50 रेड झाल्या, सीबीआयच्या 40 झाल्या आणि इन्कम टॅक्सच्या 20 झाल्या. 110 रेड झाल्या. एका व्यक्तीच्या कुटुंबात किती रेड केल्या जातात याचा उच्चांक या देशात कधी घडला नव्हता. तो आज घडला आहे. अशी टीकाही शरद पवार यांनी केली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.