.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar: मोदी सरकारच्या कथनी आणि करणीत फरक, बिल्किस बानो प्रकरणात दोषींच्या सुटकेवर काय म्हणाले शरद पवार?

पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट रोजी भाषण दिलं. मी त्यांचं भाषण बारकाईने ऐकलं. त्या भाषणात त्यांनी स्त्रियांच्या सन्मानावर जोर दिला. पण त्यांच्याच गुजरातमधील सरकारने अत्यंत घाणेरडं कृत्य करणाऱ्या आऱोपींना सोडून दिलं. यात लाल किल्ल्यातील भाषणात स्त्रियांची सन्मानाची जी भूमिका मांडली. तिची प्रचिती गुजरातमधून एका निर्णयातून समोर आली नाही. ही चिंताजनक आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या सरकारमधून पाहायला मिळत आहेत. अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

Sharad Pawar: मोदी सरकारच्या कथनी आणि करणीत फरक, बिल्किस बानो प्रकरणात दोषींच्या सुटकेवर काय म्हणाले शरद पवार?
पाचवा एक्का आणणार कुठून, भाजपाचा सवाल
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Aug 29, 2022 | 4:30 PM
Share

ठाणे – लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)हे स्त्रियांच्या सन्मानाची जी भूमिका मांडतात, ती भूमिका प्रत्यक्षात बिल्किन बानो (Bilkis Bano)प्रकरणातील दोषींची सुटका करताना दिसली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar)यांनी केली आहे. बिल्किस बानो प्रकरणात सेशन कोर्ट, हाय कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना जन्मठेप दिली. ही ११ किंवा १२ वर्षाची जन्मठेप दिली नव्हती. ती आजन्म जन्मठेपेची शिक्षा दिली. गुजरातमधील भाजपच्या सरकारने या आरोपींना मुक्त केलं. त्या आरोपींचा सत्कारही केला.

पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट रोजी भाषण दिलं. मी त्यांचं भाषण बारकाईने ऐकलं. त्या भाषणात त्यांनी स्त्रियांच्या सन्मानावर जोर दिला. पण त्यांच्याच गुजरातमधील सरकारने अत्यंत घाणेरडं कृत्य करणाऱ्या आऱोपींना सोडून दिलं. यात लाल किल्ल्यातील भाषणात स्त्रियांची सन्मानाची जी भूमिका मांडली. तिची प्रचिती गुजरातमधून एका निर्णयातून समोर आली नाही. ही चिंताजनक आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या सरकारमधून पाहायला मिळत आहेत. अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

मोदी सरकारकडून ईडीच्या गैरवापराचा पवारांचा आरोप

राजकीय नेतृत्वाच्या मागे काही ना काही तरी कारणातून ईडी कशी लावता येईल, सीबीआय लावता येईल का हे प्रकार सुरू आहेत. अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. गुजरातमध्ये या तक्रारी आहेत. झारखंडमध्ये या तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी केंद्रात ज्यांची सत्ता आहे, ते लोक त्यांची ज्या राज्यात सत्ता नाही, तिथलं सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकात आज भाजपचं सरकार आहे. पूर्वी हे सरकार नव्हतं. आधीच्या सरकारमधील काही लोक फोडले गेले. त्यांच्या मदतीने सरकार बनवलं. महाराष्ट्रात शिवसेनेतील एक वर्ग बाजूला केला आणि सरकार घालवलं. मध्यप्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वात सरकार होतं. पण ते फोडून भाजपने सरकार स्थापन केलं आहे. सत्ता लोकांनी दिली नाही तर लोकांनी दिलेल्या सदस्यांना फोडून त्यांना बाजूला करून ही सत्ता हातात घ्यायची हे काम भापजने केलं आहे.

माणसं फोडून सरकार करणे हे देशासमोर आव्हान

देशात राज्य सरकारात त्यांना संधी मिळेल याचा विश्वास त्यांना नाही. केरळमध्ये, आंध्रात, तेलंगणात बिगर भाजपा सरकार आहे. झारखंडमध्ये, पश्चिम बंगालमध्ये बिगर भाजप सरकार आहे. हे बघितलं तर मोजक्याच राज्यात भाजपचं सरकार होतं. इतर राज्यात सरकार नाही. त्यामुळे लोकांचं मत काय होतं हे दिसून येतं. सत्ता येत नसेल तर माणसं फोडणं, ईडीचं वापर करणं हे चित्रं देशात दिसत आहे. हे देशासमोर आव्हान आहे. बिगर भाजपा पक्षांशी संवाद साधून आम्ही सरकार विरोधात जनमत तयार करणार आहोत. अजून चर्चा केलेली नाही. यात लक्ष घालण्याची गरज आहे. कारण संसदीय लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. असे शरद पवार म्हणाले.

दुसऱ्या पक्षातीन नेत्यांना त्रास देतायेत-पवार

राजकीय नेत्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. राज्यात अनिल देशमुख यांच्यावर काय झालं सर्वांना माहीत आहे. त्यांना अटक केली. रेड मारली. किती रेड कराव्यात. त्यांच्या घरावर ईडीच्या 50 रेड झाल्या, सीबीआयच्या 40 झाल्या आणि इन्कम टॅक्सच्या 20 झाल्या. 110 रेड झाल्या. एका व्यक्तीच्या कुटुंबात किती रेड केल्या जातात याचा उच्चांक या देशात कधी घडला नव्हता. तो आज घडला आहे. अशी टीकाही शरद पवार यांनी केली आहे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर